शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

...तर सर्वांनी राजीनामा द्या; उद्धव ठाकरेंचं केंद्रीय मंत्री, ४८ खासदारांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 13:29 IST

महाराष्ट्राची एकजूट कुणी संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर सावध होणे गरजेच आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मुंबई – राज्यातील जे ६-७ केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्र पेटतोय, सर्वसमावेशक आरक्षण देणार नसाल तर हा आमचा राजीनामा घ्या अशी भूमिका केंद्रीय मंत्रिमंडळात मांडली पाहिजे. जर मंत्रिमंडळाने राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नसेल तर राज्यातील ४८ खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा. ही हुकुमशाही तोडून टाकण्याची वेळ आली आहे. मराठा-धनगर समाजाला समाधानी करणारे आरक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे. बाकीचे विषय बाजूला ठेवा आणि पंतप्रधानांसमोर आरक्षणाचा विषय मांडण्याचे धाडस केंद्रीय मंत्र्यांनी दाखवावे असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा धनगर समाजाला सरकारने आरक्षण द्यावे. केंद्र सरकारच्या हातात हा विषय आहे. जर विशेष अधिवेशन घेऊन प्रश्न सुटत असेल तर जरूर घ्या पण केंद्राने तात्काळ संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. ज्यांना कळालंय ३१ डिसेंबरपर्यंत अपात्र ठरणार आहोत ते राजीनामे देतायेत. केंद्रीय मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत राज्यातील मराठा आरक्षणाचा विषय मांडला पाहिजे असं त्यांनी सांगितले.

तसेच मराठा आरक्षणाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते. एक प्रचाराला दुसऱ्या राज्यात गेले, तर दुसरे डेंग्युने आजारी पडलेत. जरांगे पाटलांनी कृपा करून टोकाचे पाऊल उचलू नका. तुमच्यासारख्या लढवय्यांची राज्याला गरज आहे. आपापसात कुठेही मतभेद, जाळपोळ होईल असं करू नका. जाळपोळ करणारे दुसरे कोण असतील तर हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. जेणेकरून राज्यात नवीन उद्योग येऊ नये. महाराष्ट्रात आज अस्वस्थता आहे. मराठ्यांना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे. ते स्वाभिमानी आहेत दुसऱ्याच्या ताटातलं त्यांना नको, ओबीसी, मराठा, धनगर समाजाच्या मनात आक्रोश आहे. महाराष्ट्राची एकजूट कुणी संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर सावध होणे गरजेच आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, ज्यावेळी आमचे सरकार आले तेव्हा सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले होते. जे वकील आधीच्या सरकारने नेमलेले तेच वकील होते. तुम्ही महाराजांची शपथ घेतली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल. प्रश्न सोडवण्यासाठी मूळापर्यंत जाण्याची गरज आहे. विशेष अधिवेशन घेण्याची गरज असेल तर घ्या, आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. टक्केवारीची अडचण सोडवण्याचा अधिकार केंद्राला आहे. राज्यातील स्थिती हाताबाहेर जात आहेत. आपसात लढून उपयोग नाही. आमदार, खासदारांनी राजीनामा दिला तर केंद्राला फरक पडणार नाही. जितके केंद्रीय मंत्री आहेत, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील अन्य सगळेच त्यांनी कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मांडावा असं उद्धव ठाकरेंनी सुचवलं आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदी