शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

काँग्रेस सप्टेंबरमध्येच फुंकणार निवडणूक प्रचाराचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 5:09 AM

सत्ताधारी सेना-भाजपाचा मागील चार वर्षांचा कारभार कमालीचा निराशाजनक राहिला आहे.

- विशाल सोनटक्के नांदेड : सत्ताधारी सेना-भाजपाचा मागील चार वर्षांचा कारभार कमालीचा निराशाजनक राहिला आहे. सर्वच पातळ्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत येत्या सप्टेंबरमध्येच काँग्रेस राज्यव्यापी यात्रेच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यांत जाणाऱ्या या यात्रेमध्ये काँग्रेसचे दिग्गज पदाधिकारी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी खास ‘लोकमत’ शी संवाद साधला. विद्यमान सरकारच्या कारभाराला महाराष्टÑातील जनता कंटाळली आहे. शेतकरी, व्यापारी, कर्मचाºयांबरोबरच राज्यातील सर्व घटकांत सरकारकडून फसवणूक झाल्याची भावना असल्याने येणाºया निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने प्रदेश काँग्रेसकडून तयारी सुरु आहे. २३ जिल्ह्यांत प्रदेश काँग्रेसच्या वतीने शिबिरे घेण्यात आली आहेत. राज्यभरात बुथ कमिट्यांचेही काम सुरु आहे. गावागावांतील हे बुथ एकमेकांना जोडण्यात येत आहेत. नुकताच पक्षाच्या वतीने ‘शक्ती अ‍ॅप’चा प्रारंभ करण्यात आला. या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ता थेट काँग्रेसच्या राष्टÑीय कमिटीशी जोडला जाईल तसेच आवश्यकता पडल्यास कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेता येतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा हा प्रयोग काँग्रेस महाराष्टÑासह देशभरात राबविणार आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले.>सेना-भाजपा, एमआयएम नाण्याच्या दोन बाजूशिवसेना-भाजपा आणि एमआयएम या पक्षांची वाटचाल एकाच दिशेने सुरू आहे. हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका करीत जातीयवाद, धर्मांधतेला खतपाणी घालणाºया एमआयएमसोबत समझोता करणे घातक ठरेल. त्यामुळे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी त्या मार्गाने जावू नये.- खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण