शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सव्वादोनशे वर्षांनंतर त्रियोग

By admin | Updated: July 6, 2015 02:26 IST

आषाढ आणि त्यात अधिकमास असे सगळे योग जुळून येत असताना १८ वर्षांनंतर येणारे कोकिळाव्रत यंदा सिंहस्थ काळात आल्याने धार्मिक कार्यांची रेलचेल जाणवणार आहे.

संकेत शुक्ला, नाशिकआषाढ आणि त्यात अधिकमास असे सगळे योग जुळून येत असताना १८ वर्षांनंतर येणारे कोकिळाव्रत यंदा सिंहस्थ काळात आल्याने धार्मिक कार्यांची रेलचेल जाणवणार आहे. चतुर्मास, अधिकमास आणि त्यातच कोकिळाव्रतही आले आहे. तब्बल सव्वादोनशे वर्षांनंतर यंदा हा योग जुळून आला आहे.कोकिळाव्रत वेगवेगळ्या महिन्यात येत असते. त्यातच आषाढ महिन्यात आल्यास त्याचे वेगळे महत्त्व सांगितले जाते. दर १८ वर्षांनी आषाढात कोकिळाव्रत येते. यंदाही ते अधिकमासाला लागून आषाढातच आले आहे. एवढेच त्याचे महत्त्व नसून सिंहस्थपर्वात आलेले कोकिळापर्व म्हणून त्याकडे बघितले जाते आहे. शके १७१२ म्हणजेच इसवी सन १७९०नंतर तब्बल २२५ वर्षांनंतर सिंहस्थात कोकिळाव्रत आले आहे. त्यामुळे यंदा ‘अधिकस्य अधिक फलम्’ प्रत्यक्षात उतरले आहे. दर तीन वर्षांनी येणारा अधिकमास हा चांद्र आणि सूर्य कालगणनेमधील अंतर भरून काढण्यासाठी अधिकमास गणला जातो. चंद्रगणनेनुसार ३५६ दिवसांचे वर्ष तर सूर्यगणनेनुसार ३६५ दिवसांचे एक वर्ष असते. भारतीय पंचांग चांद्र वर्षानुसार कार्यरत असते; आणि कालगणना ही सूर्यगणनेनुसार होते. या दोघांमध्ये तीन वर्षांत एक महिन्याचे अंतर पडते. ते भरून काढण्यासाठी अधिकमास गणला जातो. त्याला पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखले जाते. त्यात धार्मिक कार्य केले जाते.गेल्या ११५ वर्षांत चार वेळा सिंहस्थात अधिकमास आला आहे. त्यात १९०९, १९४५, १९८०, २००४ आणि यंदाच्या २०१५चा समावेश आहे.पुराणकथांमध्ये उल्लेखच्पार्वतीचे वडील दक्ष प्रजापती यांनी आयोजिलेल्या यज्ञात पार्वती-शंकराला आमंत्रण नव्हते. मात्र त्यानंतरही यज्ञात पोहोचलेल्या शंकर - पार्वतीचा दक्ष राजाने अपमान केल्यानंतर क्रोधाग्नीत पार्वतीने यज्ञात देह झोकून दिला. त्यानंतर झालेला विध्वंस कमी झाल्यानंतर शंकराने पार्वतीलाही शाप दिला की, तू देहाचा त्याग केला, हे पाप आहे. त्यामुळे तू कोकिळा होशील.च्दाक्षायणी रूपात प्रगट झाल्यानंतर पार्वतीने उ:शाप मागितला. त्यावर शंकराने कोकिळाव्रत आणि कोकिळेचे महत्त्व सांगितले आणि तू काळ्या रंगाचा पक्षी झालीस तरी नंदनवनात वावरशील आणि लोकांना आल्हाददायक आनंद देशील असा उ:शाप दिला, असा उल्लेख पुराणकथांमध्ये आढळतो.