शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १७ सनदी अधिका-यांच्या बदल्या

By admin | Updated: January 14, 2015 04:07 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल हाती घेतले असून, सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घाऊक कार्यक्रम सध्या राबविला जात आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल हाती घेतले असून, सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घाऊक कार्यक्रम सध्या राबविला जात आहे. मंगळवारी देबाशिष चक्रवर्ती, आभा शुक्ला यांच्यासह १७ सनदी अधिका-याच्या राज्य सरकारने बदल्या केल्या. चक्रवर्ती यांची नियुक्ती शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली तर आभा शुक्ला यांची नियुक्ती नवी दिल्लीत निवासी आयुक्तपदी करण्यात आली आहे.चक्रवर्ती यांची दोन दिवसापूर्वी शिक्षण विभागात बदली करण्यात आली होती. मात्र ते रुजू होण्यास राजी नसल्याने त्यांच्याकडे पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालकपद देण्यात आले. तर शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी भिडे यांच्याकडे ठेवण्यात आला आहे.राज्य शासनाने केलेल्या अन्य बदल्या अशा: आशिष शर्मा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वाय. इ. केरुरे मत्स्योत्पादन आयुक्त, सचिन कुरवे मनरेगा नागपूरचे आयुक्त, ओम प्रकाश बकोरिया क्रीडा व युवक आयुक्त पुणे, उदय चौधरी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल रेखावार गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती दीपा मुधोळ बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिजीत चौधरी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एम. देवेंद्र सिंग अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संजय मीना वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आस्तिक कुमार पांड्ये जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एम. जी. अर्दाड हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ए. बी. उन्हाळे सीड कॉर्पोरेशन अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक, पी. शिवा शंकर कोल्हापूर महापालिका आयुक्त, सुशील खोडवेकर कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त. (विशेष प्रतिनिधी)