शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

टोेल आंदोलनासंदर्भात आज निर्णय

By admin | Updated: May 21, 2015 00:55 IST

कृती समितीची बैठक : कोल्हापूरच्या अस्मितेशी कदापिही दगा-फटका करणार नाही : एन. डी. पाटील

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी ‘कोल्हापूर बंद’ ठेवण्यासंदर्भात बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता पुन्हा सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय होणार आहे. रुईकर कॉलनी येथे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी तब्बल दीड तासाहून अधिक काळ सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची ही बैठक चालली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रा. पाटील यांनी ही भूमिका मांडली.प्रा.डॉ. पाटील म्हणाले, टोलविरोधी कृती समितीने आपली भूमिका सोडलेली नाही. आमच्या प्रश्नावर आम्ही ठाम आहोत. कोल्हापूरच्या अस्मितेशी आम्ही कदापिही दगा-फटका करणार नाही. आजच्या बैठकीत उपस्थितांची मते जाणून घेतली. अजून काही बैठकीला उपस्थित नसल्याने त्यांची मते जाणून घेता आलेली नाहीत. त्यांचीही मते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांचे मत ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणे योग्य नाही. आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता पुन्हा टोलविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समितीशी सरकारतर्फे अथवा सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे कोणी संपर्क साधला आहे का? या प्रश्नावर यासंदर्भात कोणीही संपर्क साधला नसल्याचे सांगितले. बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सूर कोणता होता? याबाबत विचारणा असता ते म्हणाले, लढा तीव्र करूया, असा बहुतांश जणांचा सूर आहे, परंतु सर्वांचे ऐकून घेतल्याशिवाय लगेच निर्णय घेणे योग्य नाही.बैठकीला शिवसेना-भाजपचे पदाधिकारी होते काय, अशी विचारणा केल्यावर निमंत्रक निवासराव साळोखे यांनी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित नसल्याचे सांगितले. बैठकीला प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, दिलीप पवार, अशोक पोवार, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, अजित सासने, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)