शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

बाळकृष्ण हरी कोल्हटकर यांची आज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2016 10:40 IST

आज बाळकृष्ण हरी कोल्हटकर ऊर्फ बाळ कोल्हटकर यांचा जन्मदिवस. बाळ कोल्हटकर हे मराठीतील नाटककार

प्रफुल्ल गायकवाड/ ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25- आज बाळकृष्ण हरी कोल्हटकर ऊर्फ बाळ कोल्हटकर यांचा जन्मदिवस. बाळ कोल्हटकर  हे मराठीतील नाटककार, कवी , अभिनेते, दिग्दर्शक होते. यांनी  लिहिलेल्या  दुरितांचे तिमिर  जावो,  वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे,  एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले.  
 
तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली.
 
जीवन
महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण  हरी  तथा  बाळ  कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एकमानबिंदू.
  
बाळ कोल्हटकरांचा जन्म २५ सप्टेंबर रोजी सातारा येथे झाला.  शिक्षण  जेमतेम  सातवीपर्यंतच झाले. लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी जोहार हे आपले पहिले नाटक लिहिले. 
 
१९४७ पर्यंत त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी केली. त्यानंतर लेखनासाठी आणि  रंगभूमीसाठी  त्यांनी  आपले पुढील आयुष्य वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. ज्यांनापुर्वी लोक हसायचे आणि टिंगल करायचे असे बाळ कोल्हटकर प्रेकक्षांची नस नेमकी ओळखत  असत. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले  असोत थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य  प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत.
 
त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. बर्‍याच नाटकांचे हजाराच्या  वर प्रयोग झाले.  व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती. दुरितांचे तिमिर जावो या नाटकांचे पंधराशे प्रयोग, वाहतो ही दुर्वाची जुडी या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर एखाद्याचे नशीब या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. यावरुन नाटककार म्हणून  लोकांनी  त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते.
 
बाळ कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर विभागात १९५९ ते १९७२ या काळात वास्तव्यास होते. त्यांनी खेर विभागातील प्रसिद्ध हेरंब मंदिरात 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'वेगळं व्हायचंय मला', अशी काही प्रसिद्ध नाटकं लिहिली तसेच  सीमेवरुन परत जा, लहानपणा देगा देवा, देव दीनाघरी घावला, देणार्‍याचे हात हजार, उघडलं  स्वर्गाचे दार, इत्यादी त्यांची गाजलेली नाटके. त्यांनी एकंदर ३० हून अधिक नाटके लिहिली.
 
सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न  हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली. प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी  बांधणी, काव्यात्मक संवाद आणिसुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली.
 
नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नट ही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या  त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे  मोठेपण आहे. अशा या ज्येष्ठ नाटककाराचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.
 
अंबरनाथवासीयांचे कोल्हटकरांवर त्यांच्या कविता आणि नाटकांवर विशेष प्रेम याच प्रेमापोटी अंबरनाथमध्ये २००९ -१० च्या दरम्यान बाळ कोल्हटकर ज्येष्ठ नागरिक कट्टा तयार करण्यात आला. खेर विभागातील कोल्हटकरांचा 'भूषण' हा  बंगला आजही त्यांची आठवण अंबरनाथकरांना करून  देतो.