शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

दिब्रिटो यांच्या निवडीवरून साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांसह मसापच्या कार्याध्यक्षांना धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 5:18 PM

संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्दे संमेलनापूवीर्ची वादाची किनार

पुणे : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना धमक्या दिल्या जात आहेत. एका धर्मगुरू ला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून तुम्ही समजता कोण स्वत:ला? तुम्ही चांगले केले नाहीत. तुम्ही खूप मोठी चूक केली असल्याचे सुनावले जात आहे. संमेलनापूर्वीच संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद चिघळायला सुरूवात झाली आहे.

संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. समाजातूनही साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेवर टीकेची झोड उठत आहे. मात्र आता  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना धमक्या देणा-यापर्यंत विरोधकांची मजल पोहोचली आहे. यासंदर्भात ह्यलोकमतह्णह्णशी बोलताना साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, ह्यफादरह्ण यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशा आशयाचे  ठाणे, मुंबई, नागपूर अशा विविध ठिकाणाहून जवळपास 100 दूरध्वनी आले आहेत. त्यांना ती व्यक्ती मातृभाषेत साहित्य लेखन करते किंवा ते लेखक आहेत याविषयी काहीदेणे घेणे नाही. त्यांचे दुखणे हे केवळ धार्मिक आहे. फक्त दिब्रिटो यांची निवड का केली?असा सवाल केला जात आहे. केवळ ते ख्रिश्चन असल्यानं विरोध केला जातोय. दरम्यान, अशाप्रकारच्या धमक्या येत असण्याला मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, काही लोक वैयक्तिक आणि परिषदेतही फोन करून अत्यंत अर्वाच्य भाषेत व उर्मटपणे  'तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्हाला संमेलनासाठी काय परदेशातून पैसा आला का? ' अशी दमदाटी करीत आहेत. तरीही आम्ही सौम्यपणे ते फोन स्वीकारत आहोत. व्यक्त होण्याची एक भाषा असते. त्या सीमा ओलांडल्या जात आहेत, याचे दु:ख होत आहे.----------------------------------------------------------------------------------------------साहित्य संमेलन निधर्मी असते. अध्यक्ष निवडताना कधीच धमार्चा विचार केला जात नाही. भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिला आहे. धमक्याबद्दल आम्ही तक्रार करणार नाही. आमची काळजी सरकार व गृहमंत्री घेतील. पदाधिका-यांना आलेल्या धमक्याचा प्रकार त्यांना कळला आहे. लोकशाहीत निवड प्रक्रियेला महत्त्व आहे. त्यामुळे एकदा निवड झाल्यानंतर ती मागे घेता येत नाही.- प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ 

टॅग्स :PuneपुणेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनHindutvaहिंदुत्व