शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
3
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
4
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
5
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
6
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
7
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
8
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
9
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
10
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
11
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
12
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
13
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
14
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
15
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
16
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
17
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
18
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
19
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
20
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

प्रदेशाध्यक्षपदी थोरात, पण काँग्रेसला गरज अशोक चव्हाणांची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:20 IST

भाजपचे वाढलेले वर्चस्व आणि निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कसब पाहता, राज्यातील काँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडेच असायला हवी, असं काही काँग्रेस नेत्यांच मत आहे.

- रवींद्र देशमुखमुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राजकीय पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. मात्र निवडणुकीच्या तयारीतही शिवसेना-भाजप युती आघाडीवर दिसत असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अद्याप पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. आघाडीत राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मैदानात उतरले आहे. मात्र काँग्रेसची सुस्ती गेली नसल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची नियुक्ती झाली असली तरी काँग्रेस नेत्यांच्या नजरा अशोक चव्हाण यांच्याकडेच लागल्याचे चित्र काँग्रेसमध्ये आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा मंजूर करायचा का, असा पेचही काँग्रेसमध्ये निर्माण झाला होता. परंतु, अखेरीस चव्हाण यांना कार्यमुक्त करण्यात आले. तर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आली.

थोरात यांनी धडाक्यात सुरुवात केली असली तरी पक्ष संघटनाच्या बाबतीत ते नगर जिल्ह्यातच अडकून पडले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनीही थोरात केवळ संगमनेरचे प्रदेशाध्यक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, भाजपचे वाढलेले वर्चस्व आणि निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कसब पाहता, राज्यातील काँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडेच असायला हवी, असं काही काँग्रेस नेत्यांच मत आहे. चव्हाण यांची नांदेडवर असलेली पकड काही प्रमाणात कमजोर झाली असली तरी, विधानसभेला नांदेडकर त्यांच्या पाठिशी राहिल अशी खात्री राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यभरात पक्षाचा प्रचार करण्यात अशोक चव्हाण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. अशा स्थितीत राज्य काँग्रेसचे नेतृत्व अशोक चव्हाण यांच्याकडेच असावे असं काँग्रेसमधील नेत्यांना वाटत आहे.