शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्षपदी थोरात, पण काँग्रेसला गरज अशोक चव्हाणांची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:20 IST

भाजपचे वाढलेले वर्चस्व आणि निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कसब पाहता, राज्यातील काँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडेच असायला हवी, असं काही काँग्रेस नेत्यांच मत आहे.

- रवींद्र देशमुखमुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राजकीय पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. मात्र निवडणुकीच्या तयारीतही शिवसेना-भाजप युती आघाडीवर दिसत असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अद्याप पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. आघाडीत राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मैदानात उतरले आहे. मात्र काँग्रेसची सुस्ती गेली नसल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची नियुक्ती झाली असली तरी काँग्रेस नेत्यांच्या नजरा अशोक चव्हाण यांच्याकडेच लागल्याचे चित्र काँग्रेसमध्ये आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा मंजूर करायचा का, असा पेचही काँग्रेसमध्ये निर्माण झाला होता. परंतु, अखेरीस चव्हाण यांना कार्यमुक्त करण्यात आले. तर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आली.

थोरात यांनी धडाक्यात सुरुवात केली असली तरी पक्ष संघटनाच्या बाबतीत ते नगर जिल्ह्यातच अडकून पडले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनीही थोरात केवळ संगमनेरचे प्रदेशाध्यक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, भाजपचे वाढलेले वर्चस्व आणि निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कसब पाहता, राज्यातील काँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडेच असायला हवी, असं काही काँग्रेस नेत्यांच मत आहे. चव्हाण यांची नांदेडवर असलेली पकड काही प्रमाणात कमजोर झाली असली तरी, विधानसभेला नांदेडकर त्यांच्या पाठिशी राहिल अशी खात्री राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यभरात पक्षाचा प्रचार करण्यात अशोक चव्हाण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. अशा स्थितीत राज्य काँग्रेसचे नेतृत्व अशोक चव्हाण यांच्याकडेच असावे असं काँग्रेसमधील नेत्यांना वाटत आहे.