शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्रदेशाध्यक्षपदी थोरात, पण काँग्रेसला गरज अशोक चव्हाणांची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:20 IST

भाजपचे वाढलेले वर्चस्व आणि निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कसब पाहता, राज्यातील काँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडेच असायला हवी, असं काही काँग्रेस नेत्यांच मत आहे.

- रवींद्र देशमुखमुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राजकीय पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. मात्र निवडणुकीच्या तयारीतही शिवसेना-भाजप युती आघाडीवर दिसत असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अद्याप पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. आघाडीत राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मैदानात उतरले आहे. मात्र काँग्रेसची सुस्ती गेली नसल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची नियुक्ती झाली असली तरी काँग्रेस नेत्यांच्या नजरा अशोक चव्हाण यांच्याकडेच लागल्याचे चित्र काँग्रेसमध्ये आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा मंजूर करायचा का, असा पेचही काँग्रेसमध्ये निर्माण झाला होता. परंतु, अखेरीस चव्हाण यांना कार्यमुक्त करण्यात आले. तर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आली.

थोरात यांनी धडाक्यात सुरुवात केली असली तरी पक्ष संघटनाच्या बाबतीत ते नगर जिल्ह्यातच अडकून पडले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनीही थोरात केवळ संगमनेरचे प्रदेशाध्यक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, भाजपचे वाढलेले वर्चस्व आणि निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कसब पाहता, राज्यातील काँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडेच असायला हवी, असं काही काँग्रेस नेत्यांच मत आहे. चव्हाण यांची नांदेडवर असलेली पकड काही प्रमाणात कमजोर झाली असली तरी, विधानसभेला नांदेडकर त्यांच्या पाठिशी राहिल अशी खात्री राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यभरात पक्षाचा प्रचार करण्यात अशोक चव्हाण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. अशा स्थितीत राज्य काँग्रेसचे नेतृत्व अशोक चव्हाण यांच्याकडेच असावे असं काँग्रेसमधील नेत्यांना वाटत आहे.