शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 06:41 IST

अमित शाह : नैराश्य गाडून टाका, गटबाजी संपवा, कामाला लागा, फडणवीस महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यास सक्षम

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करून २०२९ मध्ये मात्र भाजप राज्यात स्वबळावर सत्तेत येईल, असे भाकीत केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी मंगळवारी वर्तविले.  

मुंबईतील भाजपचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी यांच्या बैठकीत शाह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार व्यासपीठावर उपस्थित होते. 

निवडणुकीसाठी सर्वांचे नीतिधैर्य वाढविणारे भाषण शाह यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक आपण तिसऱ्यांदा जिंकली. काँग्रेस शंभरीही गाठू शकली नाही, मग तरीही तुम्ही निराश का राहता? नैराश्य गाडून टाका. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलेल. मला दिल्लीत विचारतात की महाराष्ट्रात काय होणार? मी आताही सांगतो, आपलीच सत्ता येणार आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आता आपल्याला महायुतीचेच सरकार आणायचे आहे, २०२९ मध्ये शुद्धपणे कमळाचे सरकार असेल.  महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत असे म्हणत त्यांनी नेतृत्व त्यांचेच असेल, असे स्पष्ट संकेत दिले. 

मतभेद नको; मुंबईच्या नेत्यांची कानउघाडणीशाह यांनी मुंबईतील पक्षांतर्गत लहानमोठे वाद तातडीने मिटवा, एकत्र बसा असा आदेश दिला. आज मी जे सांगतो आहे ते लिहून घ्या आणि त्यानुसार वागा असा सल्लाही त्यांनी दिला. मुंबई भाजपमधील गटबाजीचा थेट उल्लेख न करता त्यांनी कानउघाडणी केली. नगरसेवक, आमदार, खासदारांबद्दल तसेच सरकारबद्दल कुठे नाराजी असेल तर ती आधी दूर करा, असे ते म्हणाले. 

राज्यात ‘व्होट जिहाद’ : देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे यांना मराठी व हिंदूंचा जनाधार राहिलेला नाही, त्यांच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचतात अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लाेकसभेत ‘व्होट जिहाद’ पाहायला मिळाला होता, अशी टीका केली. लव्ह जिहादच्या राज्यात एक लाख तक्रारी आहेत. धुळ्याचे उदाहरण देऊन लोकसभा निवडणुकीत १४ मतदारसंघांमध्ये वोट जिहाद घडले, असे फडणवीस म्हणाले.

साम, दाम, दंड, भेद वापरा, पण मतदान वाढवा नवी मुंबई : महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा ठरविणार आहे. येथे जे जिंकणार ते देशावर १५ वर्षे राज्य करणार आहेत. यामुळे आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. प्रत्येक बूथवर साम, दाम, दंड, भेद अवलंबून १० टक्के मतदान वाढलेच पाहिजे, असे अमित शाह यांनी मंगळवारी पक्षाच्या कोकण विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४