शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

हे सरकार फेस टू फेस जातं, फेसबुकवर बोलणारं नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 14:07 IST

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पूर्ण ताकदीने सरकार तुमच्या पाठिशी उभे राहील असं त्यांनी सांगितले.

शिर्डी – काहींच्या पोटात मळमळ आहे, काहींच्या पोटात वळवळ आहे. अशा अनेक गोष्टी चाललेत. ३६ जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होईल. ३६५ दिवस लोकांच्या दारापर्यंत आमचे सरकार जात राहील. हे लोकांपर्यंत जाणारे सरकार आहे. बंददाराआड बसणारे सरकार नाही. हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे. फेसबुकवर बोलणारं सरकार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही जनतेपर्यंत पोहचलोय, अजून पोहचणार आहोत. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणार आहोत. नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अनेक योजना आणल्या. नमो शेतकरी योजनेतून केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून १२ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. आज दुर्दैवाने दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळते. परंतु सरकार पीक विम्याच्या माध्यमातून सर्व गोष्टी शेतकऱ्यांकडे पोहचणावर आहोत. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पूर्ण ताकदीने सरकार तुमच्या पाठिशी उभे राहील असं त्यांनी सांगितले.

तसेच शासन आपल्या दारीचं उद्देश मिशन मोडमध्ये काम करायचे. शासकीय योजना असतात पण लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शासन आपल्या दारी आलंय. तू लाभार्थी आहे, ही तुझ्या फायद्याची योजना आहे हे सांगण्यासाठी शासन आपल्या दारी येतंय. एकट्या नगर जिल्ह्यात २४ लाख लाभार्थ्यांपर्यंत आपण यानिमित्ताने पोहचलो. ३९०० कोटी रुपयांचा लाभ अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासन आपल्या दारीच्या माध्यमातून मिळतोय असंही फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, ज्यांना बोलायचे त्यांना बोलू द्या, आपण काम करत राहू, सर्वसामान्य जनतेचे परिवर्तन घडवत राहू. आम्ही पारदर्शी प्रामाणिकपणे काम करतोय. स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता तुमच्या पाठिशी ताकदीने उभे राहू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा