शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

हे सरकार फेस टू फेस जातं, फेसबुकवर बोलणारं नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 14:07 IST

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पूर्ण ताकदीने सरकार तुमच्या पाठिशी उभे राहील असं त्यांनी सांगितले.

शिर्डी – काहींच्या पोटात मळमळ आहे, काहींच्या पोटात वळवळ आहे. अशा अनेक गोष्टी चाललेत. ३६ जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होईल. ३६५ दिवस लोकांच्या दारापर्यंत आमचे सरकार जात राहील. हे लोकांपर्यंत जाणारे सरकार आहे. बंददाराआड बसणारे सरकार नाही. हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे. फेसबुकवर बोलणारं सरकार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही जनतेपर्यंत पोहचलोय, अजून पोहचणार आहोत. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणार आहोत. नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अनेक योजना आणल्या. नमो शेतकरी योजनेतून केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून १२ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. आज दुर्दैवाने दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळते. परंतु सरकार पीक विम्याच्या माध्यमातून सर्व गोष्टी शेतकऱ्यांकडे पोहचणावर आहोत. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पूर्ण ताकदीने सरकार तुमच्या पाठिशी उभे राहील असं त्यांनी सांगितले.

तसेच शासन आपल्या दारीचं उद्देश मिशन मोडमध्ये काम करायचे. शासकीय योजना असतात पण लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शासन आपल्या दारी आलंय. तू लाभार्थी आहे, ही तुझ्या फायद्याची योजना आहे हे सांगण्यासाठी शासन आपल्या दारी येतंय. एकट्या नगर जिल्ह्यात २४ लाख लाभार्थ्यांपर्यंत आपण यानिमित्ताने पोहचलो. ३९०० कोटी रुपयांचा लाभ अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासन आपल्या दारीच्या माध्यमातून मिळतोय असंही फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, ज्यांना बोलायचे त्यांना बोलू द्या, आपण काम करत राहू, सर्वसामान्य जनतेचे परिवर्तन घडवत राहू. आम्ही पारदर्शी प्रामाणिकपणे काम करतोय. स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता तुमच्या पाठिशी ताकदीने उभे राहू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा