शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

दररोजची तीस लाखांची उलाढाल ठप्प

By admin | Updated: May 21, 2015 00:08 IST

यंत्रमाग कारखान्यांवर परिणाम नाही : किमान वेतनाच्या मागणीसाठी इचलकरंजीतील ७० टक्के सायझिंग कारखाने बंद

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या फेररचनेप्रमाणे वेतन मिळण्याच्या मागणीसाठी मुंबई येथे मंत्रालयावर आज, बुधवारी मोर्चा असताना सायझिंग कामगार संपावर गेले असून, शहरातील शंभरहून अधिक सायझिंग कारखाने बंद पडले आहेत. तर या आंदोलनाचा यंत्रमाग कारखान्यांवर फारसा परिणाम झाला नसल्याने येथील वस्त्रोद्योगात आश्चर्य व्यक्त होत आहे.सायझिंग कारखाने बंद पडल्याने दररोज पाच हजार सूत बिमांचे उत्पादन ठप्प झाले आहे. तर बाजारातील रोजची तीस लाख रुपयांची उलाढाल थंडावली आहे. आणखीन दोन दिवस सायझिंग कारखाने सुरू होणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे.सन १९८६ नंतर यंत्रमाग कामगार किमान वेतनाची फेररचना शासनाने जाहीर केली नव्हती. परिणामी २९ वर्षे या क्षेत्रातील अनेक कामगार संघटनांनी विविध आंदोलने केली. अखेर लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने प्रा.ए.बी. पाटील यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायाधीश मोहीत शहा व न्या. कुलाबावाला यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी २ फेब्रुवारी २०१५ पूर्वी यंत्रमाग कामगार किमान वेतनाची फेररचना ३० जानेवारीपूर्वी करावी, असे आदेश दिले. त्याप्रमाणे २९ जानेवारीला शासनाच्या उद्योग व कामगार मंत्रालयाने यंत्रमाग कामगार किमान वेतनाची फेररचना जाहीर केली.शासनाने किमान वेतनाची फेररचना जाहीर करताना राज्यात महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण अशी तीन परिमंडले व कुशल, अर्धकुशल व अकुशल अशी कामगारांची वर्गवारी जाहीर केली. त्यासाठी महापालिका क्षेत्रात नऊ हजार ते दहा हजार शंभर, नगरपालिका क्षेत्रात साडेआठ हजार ते साडेनऊ हजार आणि ग्रामीण क्षेत्रासाठी साडेसात हजार ते साडेआठ हजार असे किमान वेतन जाहीर करण्यात आले. या फेररचनेप्रमाणे शासनाने यंत्रमाग कारखानदारांना वेतन देण्यास भाग पाडावे, यासाठी सुद्धा राज्यातील यंत्रमाग केंद्रांमधून नुकतेच मोर्चे, घेराव अशी आंदोलने व कामगार परिषदा झाल्या. आज याच मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर राज्यातील यंत्रमाग कामगारांचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.यंत्रमाग कामगारांच्या मोर्चासाठी इचलकरंजीतील सायझिंग क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने गेले आहेत. काल, मंगळवारपासून ७० टक्के सायझिंग कारखाने बंद पडले आहेत. या मोर्चाचा यंत्रमाग कारखान्यांवर फारसा परिणाम झाला नसल्याने यंत्रमाग कामगारांनी का प्रतिसाद दिला नाही, याचेच आश्चर्य येथे व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)दहा कोटींच्या कापडाची वाहतूक बंद होण्याच्या मार्गावरइचलकरंजीत तयार होणाऱ्या यंत्रमाग कापडापैकी सुमारे दहा कोटी रुपयांचे कापड दररोज बालोत्रा (राजस्थान) येथे पुढील प्रक्रियेसाठी जाते. मात्र, बालोत्रा येथील कापडावर प्रक्रिया करणारे प्रोसेसर्स कारखाने प्रदूषणामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी, रोजचे जाणारे पंधरा ट्रक कापडाची वाहतूक बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज शहरातील कापड बाजारात पॉपलीन व मलमल कापडाचे भाव एकदमच उतरल्याने खळबळ उडाली.