शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुंबईत ‘स्वाइन’ने घेतला तिसरा बळी

By admin | Updated: May 23, 2017 03:46 IST

राज्यभरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना मुंबईतही स्वाइन फ्लूमुळे तिसरा बळी गेला आहे. काही दिवसांपूर्वी वरळीतील दीड वर्षीय मुलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यभरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना मुंबईतही स्वाइन फ्लूमुळे तिसरा बळी गेला आहे. काही दिवसांपूर्वी वरळीतील दीड वर्षीय मुलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. तर कुर्ला येथील ७२ वर्षीय महिलेलाही स्वाइन फ्लूमुळे जिवाला मुकावे लागले. त्यानंतर आता १६ मे रोजी सायन रुग्णालयात भांडुप टिळकनगर येथील ३० वर्षीय गर्भवती महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.मूळची अलाहाबादची असणारी ही महिला एक महिन्यापूर्वी भांडुप येथे राहण्यास आली होती. ती सात महिन्यांची गर्भवती होती. तिला ब्रॉन्कायल अस्थमा झाल्याचे निदान झाले होते. शिवाय, तिला काही दिवसांपासून कफ, छातीत दुखणे, श्वसनात अडथळा आणि उलट्यांचाही त्रास होत होता. १३ मे रोजी सायंकाळी तिला सावित्रीबाई फुले मॅटर्निटी होममध्ये नेण्यात आले. तेथे तिला सायन रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी ७.२० वाजता तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी १६ मे रोजी सकाळी ११ वाजता तिचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने भांडुप टिळकनगर परिसरातील ५२५ घरांतील २ हजार २६ व्यक्तींची चाचणी केली असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी मुंबईत स्वाइन फ्लूचे केवळ ३ रुग्ण आढळले होते, त्यापैकी सर्व बरे झाले होते. मात्र यंदा जानेवारी ते १८ मे दरम्यानच्या कालावधीत मुंबई शहर-उपनगरात ३७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले, तर ३ मृत्यू झाले आहेत. १ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत राज्यभरात ५००हून अधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. यात १००हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून, ही संख्या पुणे व नागपूरमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे सिद्ध होत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, स्वाइन फ्लूमुळे घाबरण्याचे कारण नाही. स्वाइन फ्लू बरा होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा, गर्दीत जाणे टाळा आणि गरज पडल्यास तोंडाला रुमाल बांधा. स्वाइन फ्लूवरील लसीकरण आणि औषधे उपलब्ध आहेत. त्यांचा डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करा. या साथीदरम्यान गर्भवती, रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांत गर्भवतींसाठी लसही उपलब्ध करून दिली जात आहे.