शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

सलग तिस-या वर्षी महाराष्ट्र देशातील सर्वात भ्रष्ट राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 3:56 PM

महाराष्ट्राने सलग तिस-या वर्षी सर्वात भ्रष्ट राज्य असण्याचा 'गौरव' प्राप्त केला आहे.

नवी दिल्ली:  महाराष्ट्राने सलग तिस-या वर्षी सर्वात भ्रष्ट राज्य असण्याचा 'गौरव' प्राप्त केला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल (एनसीआरबी) प्रसीद्ध झाला आहे. यानुसार 2016 मध्ये राज्यात भ्रष्टाचाराचे 1 हजार 16 प्रकरणं समोर आली. म्हणजे देशातील एकूण भ्रष्टाचाराच्या तब्बल 22.9 टक्के घटना या एकट्या महाराष्ट्रात समोर आल्या आहेत. 2015 मध्ये राज्यात भ्रष्टाचाराच्या 1279 तर 2014 मध्ये 1316 घटना समोर आल्या होत्या, त्या तुलनेत 2016 मध्ये आकडेवारी कमी झाल्याचं दिसतं. 

महाराष्ट्राखालोखाल ओडिसाचा नंबर लागतो. ओडिसामध्ये भ्रष्टाचाराच्या 569 घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर केरळमध्ये 430 , मध्य प्रदेशमध्ये 402 , आणि राजस्थानमध्ये 387 प्रकरणं समोर आली आहेत. 

  • राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा-

महाराष्ट्रात गुन्ह्य़ांची संख्या 2015 मधील 4 लाख 23 हजारांवरून 2016 मध्ये 4 लाख 30 हजारांवर गेली. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे 217 इतके आहे.

  • सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशात-

देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशातच झाली आहे. 2016 मधील एकूण गुन्ह्य़ांची संख्या 48 लाख 31 हजार 515 इतकी आहे. 2015 मध्ये हीच संख्या 47 लाख 10 हजार 676 इतकी होती. म्हणजे गुन्ह्य़ांमध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात 2 लाख  82 हजार गुन्ह्य़ांची नोंद आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळचा नंबर आहे. महिलांवरील अत्याचारांच्या आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदविलेल्या गुन्ह्य़ांच्या संख्येतही किंचित वाढ झाल्याचे अहवाल सांगतो.

  • 'मर्डर'मध्ये योगींचं राज्य नंबर 1-

2016 मध्ये अपेक्षेप्रमाणे देशातील सर्वाधिक जास्त हत्यांची नोंद उत्तर प्रदेशात झाली असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षी खूनाच्या येथे सर्वाधिक 4,889 घटना घडल्या आहेत. त्या खालोखाल बिहारचा नंबर आहे, येथे 2 हजार 581 खून पडले. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार