शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान

By संदीप आडनाईक | Updated: May 19, 2025 20:19 IST

आमदार रोहित पवार यांनी पक्षात आलबेल नसल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी महायुतीत दोन पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवारांनाही डिवचले.

- संदीप आडनाईक, कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटात सर्व काही आलबेल नाही अशा बातम्या येत आहेत, मात्र त्यात काही तथ्य नाही. शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे लवकरच काही निर्णय घेणार आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत या पक्षातील नेत्यांच्या नेतृत्वात बदल दिसतील, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रोहित पवार सोमवारी कोल्हापुरातील दौऱ्यात माध्यमांशी बोलत होते. 

आमदार रोहित पवार म्हणाले, "ईडीने आजपर्यंत जे आरोप केले आहेत, त्यातील ९९ टक्के आरोप हे खरे नव्हते. या कायद्यामध्ये चांगले बदल होत असतील, तर स्वागतच आहे. विरोधी पक्षांनी जनतेसाठी एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर रस्त्यावर उतरायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही."

पालकमंत्रिपदाचा विषय २०२९ मध्ये सुटेल

"रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपदाचा विषय २०२९ मध्ये सुटेल. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्यामुळे पालकमंत्रिपदाची जबाबदारी मुख्यमंत्री स्वत:कडे घेतील असे वाटते. बीडमध्ये पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचा वचक कमी पडत आहे", अशी टीका त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर केली. 

वाचा >>लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

"अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सत्तेतील नेते गोकुळमध्ये राजकारण करत आहेत. कृषिमंत्री कुठेच दिसत नाहीत, त्यांना या अधिवेशनात शोधून काढू", असा इशारा रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंना दिला. 

तिरंगा रॅली हा राजकीय स्टंट

तिरंगा रॅली काढताना राजकीय स्टंट केला जात आहे, हे अमित ठाकरे यांचे म्हणणे योग्य आहे. देशातील नागरिक केवळ भारतीय सैन्यामुळे सुरक्षित आहेत. जवानांना क्रेडिट देण्यापेक्षा काही नेत्यांना क्रेडिट दिले जात आहे, असेही रोहित पवार म्हणाले. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुती