शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

चिंताजनक! पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रात अद्याप पेरणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 17:43 IST

पेरणीपासून पावसाच्या सरासरीत ४३ टक्क्यांची तूट व आता १५ दिवसांपासून दडी यामुळे पश्चिम विदर्भात ५ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे.

अमरावती - पेरणीपासून पावसाच्या सरासरीत ४३ टक्क्यांची तूट व आता १५ दिवसांपासून दडी यामुळे पश्चिम विदर्भात ५ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. दोन दिवसांत पाऊस न आल्यास किमान १० लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या उलटण्याची भीती निर्माण झालेली आहे. पावसाळ्यात तापमानवाढ झाल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या, तर बीजांकुर करपायला लागले आहेत. पेरणीला उशीर झाल्यामुळे शेतकºयांनी आपत्कालीन नियोजन करणे महत्त्वाचे आहे.पावसाचे १२० पैकी ४८ दिवस पार झाले आहेत. या कालावधीत सरासरीच्या ५७ टक्केच पाऊस झाल्याने अमरावती विभागातील पेरण्या माघारल्या. विभागीय उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती विभागात १ जून ते १८ जुलै या कालावधीत ३००.९ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १६७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. विभागातील पाचही जिल्हे पावसाच्या सरासरीत माघारले आहेत. अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या ५१ टक्केच पाऊस झालेला आहे. अकोला ६५, यवतमाळ ३५.८, बुलडाणा ८२.७ व वाशिम जिल्ह्यात ५१.२ टक्के पावसाची नोंद झालेली असल्याने याचा थेट परिणाम पेरणीवर झाला आहे.यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३२ लाख ३१ हजार ८०० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्याच्या तुलनेत सद्यस्थितीत २६ लाख ७३ हजार १०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ८३ टक्केवारी आहे. पावसाअभावी अद्यापही साडेपाच लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत. विभागीय सहसंचालकांच्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात ४,५३,५०० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली, ही ६१ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे ६,९७,००० हेक्टरमध्ये ९८ टक्के पेरणी आटोपली. अकोला जिल्ह्यात ३,४४,००० हेक्टर म्हणजे ७२ टक्के, वाशीम जिल्ह्यात ३ लाख १० हजार हेक्टर म्हणजेच सरासरीच्या ८३ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात ८ लाख ४७ हजार ३०० हेक्टर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या ९४ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे.

 सोयाबीन, कपाशीचे सर्वाधिक क्षेत्रयंदा सर्वाधिक ११ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी सद्यस्थितीत झाली आहे. कपाशी ९ लाख ८८ हजार ८०० हेक्टर, धान १०८४ हेक्टर, खरीप ज्वारी ३,९२०० हेक्टर, बाजरी २९८ हेक्टर, मका २,७२०० हेक्टर, तूर ३,५५,९०० हेक्टर, मूग ५२,३००, उडीद ४५,१०० हेक्टर, भुईमूग ६०० हेक्टर, तीळ १६०० हेक्टर, सूर्यफूल १३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. मात्र, पावसाचा ४ जुलैपासून खंड असल्याने यापैकी २५ ते ४० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीची शक्यता आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या ३५.८ टक्केच पाऊस पश्चिम विदर्भातील २६ तालुक्यांत पावसाची सरासरी ५० टक्क्यांच्या आत आहे. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात पावसाची स्थिती फार गंभीर आहे. यामध्ये सर्वच १६ ही तालुक्यांत अपेक्षित सरासरीच्या ३५.८ टक्केच पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात पाच, अकोला एक, बुलडाणा एक तर वाशिम जिल्ह्यात तीन तालुक्यांची सरासरी ५० टक्क्यांच्या आत आहे. सर्वाधिक १२३ टक्के पाऊस शेगाव, तर सर्वात कमी २९ टक्के पाऊस मूर्तिजापूर तालुक्यात झालेला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीVidarbhaविदर्भRainपाऊसagricultureशेती