शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

चिंताजनक! पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रात अद्याप पेरणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 17:43 IST

पेरणीपासून पावसाच्या सरासरीत ४३ टक्क्यांची तूट व आता १५ दिवसांपासून दडी यामुळे पश्चिम विदर्भात ५ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे.

अमरावती - पेरणीपासून पावसाच्या सरासरीत ४३ टक्क्यांची तूट व आता १५ दिवसांपासून दडी यामुळे पश्चिम विदर्भात ५ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. दोन दिवसांत पाऊस न आल्यास किमान १० लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या उलटण्याची भीती निर्माण झालेली आहे. पावसाळ्यात तापमानवाढ झाल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या, तर बीजांकुर करपायला लागले आहेत. पेरणीला उशीर झाल्यामुळे शेतकºयांनी आपत्कालीन नियोजन करणे महत्त्वाचे आहे.पावसाचे १२० पैकी ४८ दिवस पार झाले आहेत. या कालावधीत सरासरीच्या ५७ टक्केच पाऊस झाल्याने अमरावती विभागातील पेरण्या माघारल्या. विभागीय उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती विभागात १ जून ते १८ जुलै या कालावधीत ३००.९ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १६७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. विभागातील पाचही जिल्हे पावसाच्या सरासरीत माघारले आहेत. अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या ५१ टक्केच पाऊस झालेला आहे. अकोला ६५, यवतमाळ ३५.८, बुलडाणा ८२.७ व वाशिम जिल्ह्यात ५१.२ टक्के पावसाची नोंद झालेली असल्याने याचा थेट परिणाम पेरणीवर झाला आहे.यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३२ लाख ३१ हजार ८०० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्याच्या तुलनेत सद्यस्थितीत २६ लाख ७३ हजार १०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ८३ टक्केवारी आहे. पावसाअभावी अद्यापही साडेपाच लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत. विभागीय सहसंचालकांच्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात ४,५३,५०० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली, ही ६१ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे ६,९७,००० हेक्टरमध्ये ९८ टक्के पेरणी आटोपली. अकोला जिल्ह्यात ३,४४,००० हेक्टर म्हणजे ७२ टक्के, वाशीम जिल्ह्यात ३ लाख १० हजार हेक्टर म्हणजेच सरासरीच्या ८३ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात ८ लाख ४७ हजार ३०० हेक्टर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या ९४ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे.

 सोयाबीन, कपाशीचे सर्वाधिक क्षेत्रयंदा सर्वाधिक ११ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी सद्यस्थितीत झाली आहे. कपाशी ९ लाख ८८ हजार ८०० हेक्टर, धान १०८४ हेक्टर, खरीप ज्वारी ३,९२०० हेक्टर, बाजरी २९८ हेक्टर, मका २,७२०० हेक्टर, तूर ३,५५,९०० हेक्टर, मूग ५२,३००, उडीद ४५,१०० हेक्टर, भुईमूग ६०० हेक्टर, तीळ १६०० हेक्टर, सूर्यफूल १३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. मात्र, पावसाचा ४ जुलैपासून खंड असल्याने यापैकी २५ ते ४० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीची शक्यता आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या ३५.८ टक्केच पाऊस पश्चिम विदर्भातील २६ तालुक्यांत पावसाची सरासरी ५० टक्क्यांच्या आत आहे. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात पावसाची स्थिती फार गंभीर आहे. यामध्ये सर्वच १६ ही तालुक्यांत अपेक्षित सरासरीच्या ३५.८ टक्केच पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात पाच, अकोला एक, बुलडाणा एक तर वाशिम जिल्ह्यात तीन तालुक्यांची सरासरी ५० टक्क्यांच्या आत आहे. सर्वाधिक १२३ टक्के पाऊस शेगाव, तर सर्वात कमी २९ टक्के पाऊस मूर्तिजापूर तालुक्यात झालेला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीVidarbhaविदर्भRainपाऊसagricultureशेती