शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

राज्यात दोन आठवडे पाऊस नाही; विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 06:28 IST

६ ते १२ जून या कालावधीत ईशान्य भारत आणि दक्षिण कर्नाटकच्या भागात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यात १२ जूनपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे आभाळाकडे तोंड लावून बसलेल्या बळीराजाला आणखी दोन आठवडे पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हवामान विभागाने येत्या १२ जूनपर्यंतच्या पावसाचा अंदाज गुरुवारी (दि. ३०) जाहीर केला. २० मे च्या सुमारास अंदमान आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनचे आगमन झाले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे मॉन्सूनची पुढील वाटचाल थांबलेली आहे. केरळमध्येही मॉन्सूनचे आगमन झालेले नाही. मात्र, स्थानिक स्थितीमुळे केरळासह महाराष्ट्रातील काही भागात येत्या सप्ताहात पावसाच्या काही सरी कोसळतील.येत्या आठवड्यात ईशान्य भारतात जोरदार पाऊस कोसळेल, बिहार, झारखंड, दक्षिण कर्नाटकातील काही भाग, केरळ आणि लक्षद्वीप येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ६ ते १२ जून या कालावधीत ईशान्य भारत आणि दक्षिण कर्नाटकच्या भागात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वळवाच्या पावसाची पाठदेशात १ मार्च ते २९ मे या कालावधीत होणाऱ्या पावसात २४ टक्के घट झाली आहे. देशात या काळात सरासरी १२६.६ मिलिमीटर पाऊस पडतो. आत्तापर्यंत देशभरात सरासरी ९६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उत्तर पश्चिम भारतात ७८ मिलिमीटर (२९ टक्के घट), मध्यभारतात ३१.७ (१७ टक्के घट), दक्षिण भारतात ६१.८ (४८ टक्के घट) आणि ईशान्य भारतात ३१२.५ मिलिमीटर (१२ टक्के घट) पाऊस झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भweatherहवामान