शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी माझ्या विरोधाचा प्रश्नच नाही : भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 16:19 IST

अजित पवार यांनी भाजपसोबत जावून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्यामुळे खुद्द शरद पवार नाराज झाले होते. हे एकप्रकारे अजित पवार यांचे बंडच होते. त्यामुळे पक्षात मतभेद निर्माण झाले होते. मात्र शरद पवार यांनी ही स्थिती योग्य पद्धतीने हाताळल्यामुळे बंड शांत झाले. अर्थात यामुळेच अजित पवार यांच्या मंत्रीपदावर अद्याप शिक्कामोर्तब होण्यास विलंब होत आहे. 

मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत जावून सत्ता स्थापन करणारे अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच विचारमंथन सुरू आहे. त्यामुळे अद्याप उपमुख्यमंत्रीपदी कोण हे राष्ट्रवादीने अद्याप उघड केले नाही. तर छगन भुजबळ यांनी देखील अजित पवार उपमुख्यमंत्री होणार असतील तर त्याला आपला विरोध असण्याचा प्रश्नच नाही, असं म्हटलं आहे. 

अजित पवार भाजपसोबत गेले असताना त्यांना परत आणण्यासाठी आपण देखील प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी विरोधाचं करणच नाही, अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे. तसेच पक्षात कोणाला कोणतं पद द्यायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान शरद पवार हेच योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी देतील यात शंका नाही. तसेच अजित पवार यांच्याविषयीचा निर्णय तेच घेतील. त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असतील तर त्याला आपला विरोध नसल्याचा पुनरोच्चार त्यांनी केला. 

अजित पवार यांनी भाजपसोबत जावून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्यामुळे खुद्द शरद पवार नाराज झाले होते. हे एकप्रकारे अजित पवार यांचे बंडच होते. त्यामुळे पक्षात मतभेद निर्माण झाले होते. मात्र शरद पवार यांनी ही स्थिती योग्य पद्धतीने हाताळल्यामुळे बंड शांत झाले. अर्थात यामुळेच अजित पवार यांच्या मंत्रीपदावर अद्याप शिक्कामोर्तब होण्यास विलंब होत आहे.