शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 20:56 IST

ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यातून भारतीय जनता पक्षाचे सरकार गेले नसते...

ठळक मुद्देनिवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक काहींच्या मनात अजूनही ईव्हीएमबाबत शंका असून ही शंका लोकशाहीला मारक

पुणे: ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही, ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यातून भारतीय जनता पक्षाचे सरकार गेले नसते. परंतु,काहींच्या मनात अजूनही ईव्हीएमबाबत शंका असून ही शंका लोकशाहीला मारक आहे,असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केले.लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व पदाधिका-यांची पुणे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. बैठकीस खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण,शहराध्यक्ष चेतन तुपे,आमदार जयदेव गायकवाड , राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते.अजित पवार यांनी निवडणुकीबरोबरच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना अजित पवार म्हणाले,केवळ व्हिडिओ कॉन्फरन्स घेवून दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष दुष्काळी भागांना भेट देणे गरजेचे आहे. मात्र,भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी व मंत्री प्रत्यक्ष दुष्काळी भागात जाण्यास घाबरत आहेत. कारण अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत, केवळ आचारसंहितेचा बाऊ करत आहेत. तसेच अनेक अधिकारी परदेश दौऱ्यावर गेले आहेत.राज्य शासनाकडून प्रत्येक गोष्टीत अट घातली जात आहे.त्यामुळे हे सरकार अटीचे सरकार आहे,अशी टीका करत अजित पवार म्हणाले, सरकारकडून आरक्षणाला अट,चारा छावण्यांना अट,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाला अट घातली जात आहे. त्यातून कोणाचेही भले होणार नाही. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढगांबाबत, ईमेल व डिजिटल कॅमेरा विषयी केलेले विधान हास्यास्पद असून ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांनाही न पटणारे आहे.दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत अजित पवार यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेवून चर्चा केली. दुष्काळ बाधितांना सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, असे अंकुश काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारBJPभाजपा