शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 20:56 IST

ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यातून भारतीय जनता पक्षाचे सरकार गेले नसते...

ठळक मुद्देनिवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक काहींच्या मनात अजूनही ईव्हीएमबाबत शंका असून ही शंका लोकशाहीला मारक

पुणे: ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही, ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यातून भारतीय जनता पक्षाचे सरकार गेले नसते. परंतु,काहींच्या मनात अजूनही ईव्हीएमबाबत शंका असून ही शंका लोकशाहीला मारक आहे,असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केले.लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व पदाधिका-यांची पुणे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. बैठकीस खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण,शहराध्यक्ष चेतन तुपे,आमदार जयदेव गायकवाड , राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते.अजित पवार यांनी निवडणुकीबरोबरच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना अजित पवार म्हणाले,केवळ व्हिडिओ कॉन्फरन्स घेवून दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष दुष्काळी भागांना भेट देणे गरजेचे आहे. मात्र,भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी व मंत्री प्रत्यक्ष दुष्काळी भागात जाण्यास घाबरत आहेत. कारण अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत, केवळ आचारसंहितेचा बाऊ करत आहेत. तसेच अनेक अधिकारी परदेश दौऱ्यावर गेले आहेत.राज्य शासनाकडून प्रत्येक गोष्टीत अट घातली जात आहे.त्यामुळे हे सरकार अटीचे सरकार आहे,अशी टीका करत अजित पवार म्हणाले, सरकारकडून आरक्षणाला अट,चारा छावण्यांना अट,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाला अट घातली जात आहे. त्यातून कोणाचेही भले होणार नाही. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढगांबाबत, ईमेल व डिजिटल कॅमेरा विषयी केलेले विधान हास्यास्पद असून ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांनाही न पटणारे आहे.दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत अजित पवार यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेवून चर्चा केली. दुष्काळ बाधितांना सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, असे अंकुश काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारBJPभाजपा