शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 20:56 IST

ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यातून भारतीय जनता पक्षाचे सरकार गेले नसते...

ठळक मुद्देनिवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक काहींच्या मनात अजूनही ईव्हीएमबाबत शंका असून ही शंका लोकशाहीला मारक

पुणे: ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही, ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यातून भारतीय जनता पक्षाचे सरकार गेले नसते. परंतु,काहींच्या मनात अजूनही ईव्हीएमबाबत शंका असून ही शंका लोकशाहीला मारक आहे,असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केले.लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व पदाधिका-यांची पुणे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. बैठकीस खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण,शहराध्यक्ष चेतन तुपे,आमदार जयदेव गायकवाड , राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते.अजित पवार यांनी निवडणुकीबरोबरच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना अजित पवार म्हणाले,केवळ व्हिडिओ कॉन्फरन्स घेवून दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष दुष्काळी भागांना भेट देणे गरजेचे आहे. मात्र,भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी व मंत्री प्रत्यक्ष दुष्काळी भागात जाण्यास घाबरत आहेत. कारण अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत, केवळ आचारसंहितेचा बाऊ करत आहेत. तसेच अनेक अधिकारी परदेश दौऱ्यावर गेले आहेत.राज्य शासनाकडून प्रत्येक गोष्टीत अट घातली जात आहे.त्यामुळे हे सरकार अटीचे सरकार आहे,अशी टीका करत अजित पवार म्हणाले, सरकारकडून आरक्षणाला अट,चारा छावण्यांना अट,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाला अट घातली जात आहे. त्यातून कोणाचेही भले होणार नाही. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढगांबाबत, ईमेल व डिजिटल कॅमेरा विषयी केलेले विधान हास्यास्पद असून ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांनाही न पटणारे आहे.दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत अजित पवार यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेवून चर्चा केली. दुष्काळ बाधितांना सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, असे अंकुश काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारBJPभाजपा