शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

"....तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा"; रोहित पवारांची महायुती सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 11:44 IST

एसटी कर्मचारी पगार: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा तापला आहे. पुरेसे पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांना एकूण पगारापैकी ५६ टक्केच रक्कम दिली गेली.

ST Karmachari Pagar: परिवहन महामंडळाकडे निधी नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा ५६ टक्केच पगार दिला गेला. हा प्रकार समोर आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना संतप्त झाल्या. त्यामुळे राज्य सरकारने हस्तक्षेप करत उर्वरित ४४ टक्के पगार मंगळवारपर्यंत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावरूनच आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राज्य सरकारकडून एसटी प्रवासासाठी वेगवेगळ्या सवलत योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या योजनांचे प्रतिपूर्तीचे पैसे राज्य सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाला दिले जातात. पण, राज्य सरकारकडून सगळे पैसे दिले न गेल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा ५६ टक्केच पगार करण्यात आला. 

वाचा >एसटी कर्मचाऱ्यांचे जगायचे वांदे! आधीच उशिरा वेतन, या महिन्यात तर अर्धाच पगार हातावर

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.  "एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी फक्त वल्गना करण्यातच हे सरकार धन्यता मानताना दिसत आहे. या महिन्याची १० तारीख आली, तरी पगार होत नाहीत. या महिन्यात तर केवळ ५५ टक्के पगार म्हणजे २०,००० पगार असेल तर केवळ ११,००० पगार झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी निम्म्या पगारात घर चालवायचं तरी कसं?", असा सवाल करत "अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यावर बोलतील, ही अपेक्षा", असे रोहित पवार म्हणाले. 

रोहित पवारांनी पुढे म्हटले आहे की, "सरकारकडे एसटीला द्यायला पैसे नसतील तर आमदारांचे, मोठ्या अधिकाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आधी करा, ही विनंती!", अशी मागणी त्यांनी महायुती सरकारकडे केली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना निम्माच पगार का दिला गेला?

राज्य परिवहन महामंडळाला एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे लागतात. राज्य सरकारकडून गेल्या महिन्याच्या प्रतिपूर्तीपोटीची रक्कम २७२ कोटी ९६ लाख रुपये दिले गेले. त्यातील ४० कोटी महामंडळाने एसटी बँकेकडे वर्ग केले, तर काही रक्कम कर्मचारी पीएफसाठी दिली गेली. त्यामुळे पगारासाठी १३५ कोटी रुपयेच उरले होते. 

राज्याचे परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनीही अर्थ खात्याकडून प्रतिपूर्तीचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. प्रवासी वाढले आहेत, पण सरकारकडून पैसे वेळेवर दिले जात नाही आणि यासंदर्भात अजित पवारांना विनंती करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :state transportएसटीBus DriverबसचालकRohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती