शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

"…मग लावा बांबू’’, राज ठाकरेंचा सत्ताधारी आणि विरोधकांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:38 IST

Raj Thackeray News: रविवारी  एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांचं नाव न घेता काही लोकांना बांबू लावण्याची आवश्यकता आसल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनीही आज त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता या वादावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

मागच्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टोकाचे आरोप प्रत्यारोप आणि शाब्दिक चिखलफेकीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. दरम्यान, कालपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात बांबू चर्चेत आला आहे. रविवारी  एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांचं नाव न घेता काही लोकांना बांबू लावण्याची आवश्यकता आसल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनीही आज त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आता या वादावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. लावा म्हणावं बांबू, असं विधान राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक आज झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी राज ठाकरे यांनी ‘’लावा म्हणावं बांबू”, अशी प्रतिक्रिया देत विषय संपवला.राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात विकासापेक्षा जातीपातीवरून  तेढ निर्माण करून हाताला मतं लागताहेत हे नेतेमंडळींना कळलंय. त्यामुळे हे त्याच प्रकारे पुढे जातील. मला वाटतं की, समाजानं ही गोष्ट ओळखण्याची गरज आहे असं आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केलं. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला होता. या कार्यक्रमामध्ये बांबूचं महत्त्व पटवून देताना मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना बांबू लावला पाहिजे, असं विधान केलं होतं. एकनाथ शिंदे म्हणाले की, बांबू हा ऑक्सिजन अधिक देणारा आणि कार्बन डाय ऑक्साइड अधिक प्रमाणात शोषून घेणारा आहे. बांबूचे एवढे बायो प्रॉडक्ट आहेत की आपण विचारही करू शकणार नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड केली पाहिजे. तसेच काही लोकांना बांबूही लावायला पाहिजे. काही असे लोक आहेत की सकाळीच भोंगा वाजतो. एक भोंगा निघालाय तर दुसरा चालू आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला होता. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊत