शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कवी आमदार होतो तेव्हाची गोष्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:49 IST

शेती, सिंचन, जलसंधारण, कोरडवाहू शेतीचे नियोजन या विषयी त्यांचे सखोल चिंतन या भाषणांतून दिसते. ते केवळ चिंतन नव्हते तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडही होती. 

नकवी ना. धों. महानोर यांची विधान परिषदेतील १२ वर्षांच्या कारकिर्दीतील अनेक भाषणे ही कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शक होती. कृषीविषयक  धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महानोर यांचे विचार राज्य सरकारसाठी दिशादर्शक ठरले. शेती, सिंचन, जलसंधारण, कोरडवाहू शेतीचे नियोजन या विषयी त्यांचे सखोल चिंतन या भाषणांतून दिसते. ते केवळ चिंतन नव्हते तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडही होती. 

शेतकऱ्यांच्या विपन्नावस्थेविषयी ते म्हणाले होते, की या विषयावर तेच ते बोलण्याचा मला कंटाळा आला आहे. तेच ते आणि तेच ते ही विंदा करंदीकरांची कविता मला आठवते. राज्यकर्त्यांच्या संवेदना गोठून गेल्या आहेत असे वाटते.  तेच ते पाणी, तेच ते राज्य, मंत्रीही तेच ते असे सगळे चालले आहे. 

सत्ता, मुख्यमंत्री बदलले की आपली कृषिविषयक धोरणे बदलतात असे होऊ नये. दहा वर्षे एकात्मिक कार्यक्रम कोणताही बदल न करता राबविला तर सात वर्षांतच त्याची यशस्वी अंमलबजावणी होऊ शकेल. ज्या गावचे मजूर, त्याच गावची माती, त्याच गावचे पाणी, त्याच गावची झाडे यानुसार सारे उभे केले पाहिजे.   

महानोर यांच्या भाषणांतून...- वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना पाणी अडवा पाणी जिरवा, असे त्यांनी सांगितले होते. पाणी अडवा बदलले, जलसंधारण हे नाव आले, माणसे बदलली, नावे बदलली; पण शेतकऱ्यांचे नशीब नाही बदलले. 

- इस्राइलसारखे देश स्वत:च्या दु:खाची भैरवी गात बसले नाहीत. देशाविषयीचा एकसंधपणा त्यांच्याकडे आहे;  आपण त्यात आणि नियोजनात कमी पडतो. इस्राइल, जर्मनी, जपानचे शास्त्र व तंत्रज्ञान आपण शेतीत वापरत नाही तोवर इथे चर्चा करून काहीही होणार नाही. इस्राइलचे पाणी वाटपाचे तंत्र आपण वापरले तर तिप्पट पाणी मिळेल. 

- उसासाठी शेतीला वारेमाप पाणी दिले जाते. हे तर असे आहे की श्रीमंत माणसाला डायबिटीस झाला आहे आणि कोरडवाहू शेतकरी जगू शकत नाही. हा बागायती आणि कोरडवाहू शेतीतील फरक आहे.   

टॅग्स :literatureसाहित्यMLAआमदारMaharashtraमहाराष्ट्र