शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

कवी आमदार होतो तेव्हाची गोष्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:49 IST

शेती, सिंचन, जलसंधारण, कोरडवाहू शेतीचे नियोजन या विषयी त्यांचे सखोल चिंतन या भाषणांतून दिसते. ते केवळ चिंतन नव्हते तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडही होती. 

नकवी ना. धों. महानोर यांची विधान परिषदेतील १२ वर्षांच्या कारकिर्दीतील अनेक भाषणे ही कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शक होती. कृषीविषयक  धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महानोर यांचे विचार राज्य सरकारसाठी दिशादर्शक ठरले. शेती, सिंचन, जलसंधारण, कोरडवाहू शेतीचे नियोजन या विषयी त्यांचे सखोल चिंतन या भाषणांतून दिसते. ते केवळ चिंतन नव्हते तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडही होती. 

शेतकऱ्यांच्या विपन्नावस्थेविषयी ते म्हणाले होते, की या विषयावर तेच ते बोलण्याचा मला कंटाळा आला आहे. तेच ते आणि तेच ते ही विंदा करंदीकरांची कविता मला आठवते. राज्यकर्त्यांच्या संवेदना गोठून गेल्या आहेत असे वाटते.  तेच ते पाणी, तेच ते राज्य, मंत्रीही तेच ते असे सगळे चालले आहे. 

सत्ता, मुख्यमंत्री बदलले की आपली कृषिविषयक धोरणे बदलतात असे होऊ नये. दहा वर्षे एकात्मिक कार्यक्रम कोणताही बदल न करता राबविला तर सात वर्षांतच त्याची यशस्वी अंमलबजावणी होऊ शकेल. ज्या गावचे मजूर, त्याच गावची माती, त्याच गावचे पाणी, त्याच गावची झाडे यानुसार सारे उभे केले पाहिजे.   

महानोर यांच्या भाषणांतून...- वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना पाणी अडवा पाणी जिरवा, असे त्यांनी सांगितले होते. पाणी अडवा बदलले, जलसंधारण हे नाव आले, माणसे बदलली, नावे बदलली; पण शेतकऱ्यांचे नशीब नाही बदलले. 

- इस्राइलसारखे देश स्वत:च्या दु:खाची भैरवी गात बसले नाहीत. देशाविषयीचा एकसंधपणा त्यांच्याकडे आहे;  आपण त्यात आणि नियोजनात कमी पडतो. इस्राइल, जर्मनी, जपानचे शास्त्र व तंत्रज्ञान आपण शेतीत वापरत नाही तोवर इथे चर्चा करून काहीही होणार नाही. इस्राइलचे पाणी वाटपाचे तंत्र आपण वापरले तर तिप्पट पाणी मिळेल. 

- उसासाठी शेतीला वारेमाप पाणी दिले जाते. हे तर असे आहे की श्रीमंत माणसाला डायबिटीस झाला आहे आणि कोरडवाहू शेतकरी जगू शकत नाही. हा बागायती आणि कोरडवाहू शेतीतील फरक आहे.   

टॅग्स :literatureसाहित्यMLAआमदारMaharashtraमहाराष्ट्र