शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कवी आमदार होतो तेव्हाची गोष्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:49 IST

शेती, सिंचन, जलसंधारण, कोरडवाहू शेतीचे नियोजन या विषयी त्यांचे सखोल चिंतन या भाषणांतून दिसते. ते केवळ चिंतन नव्हते तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडही होती. 

नकवी ना. धों. महानोर यांची विधान परिषदेतील १२ वर्षांच्या कारकिर्दीतील अनेक भाषणे ही कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शक होती. कृषीविषयक  धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महानोर यांचे विचार राज्य सरकारसाठी दिशादर्शक ठरले. शेती, सिंचन, जलसंधारण, कोरडवाहू शेतीचे नियोजन या विषयी त्यांचे सखोल चिंतन या भाषणांतून दिसते. ते केवळ चिंतन नव्हते तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडही होती. 

शेतकऱ्यांच्या विपन्नावस्थेविषयी ते म्हणाले होते, की या विषयावर तेच ते बोलण्याचा मला कंटाळा आला आहे. तेच ते आणि तेच ते ही विंदा करंदीकरांची कविता मला आठवते. राज्यकर्त्यांच्या संवेदना गोठून गेल्या आहेत असे वाटते.  तेच ते पाणी, तेच ते राज्य, मंत्रीही तेच ते असे सगळे चालले आहे. 

सत्ता, मुख्यमंत्री बदलले की आपली कृषिविषयक धोरणे बदलतात असे होऊ नये. दहा वर्षे एकात्मिक कार्यक्रम कोणताही बदल न करता राबविला तर सात वर्षांतच त्याची यशस्वी अंमलबजावणी होऊ शकेल. ज्या गावचे मजूर, त्याच गावची माती, त्याच गावचे पाणी, त्याच गावची झाडे यानुसार सारे उभे केले पाहिजे.   

महानोर यांच्या भाषणांतून...- वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना पाणी अडवा पाणी जिरवा, असे त्यांनी सांगितले होते. पाणी अडवा बदलले, जलसंधारण हे नाव आले, माणसे बदलली, नावे बदलली; पण शेतकऱ्यांचे नशीब नाही बदलले. 

- इस्राइलसारखे देश स्वत:च्या दु:खाची भैरवी गात बसले नाहीत. देशाविषयीचा एकसंधपणा त्यांच्याकडे आहे;  आपण त्यात आणि नियोजनात कमी पडतो. इस्राइल, जर्मनी, जपानचे शास्त्र व तंत्रज्ञान आपण शेतीत वापरत नाही तोवर इथे चर्चा करून काहीही होणार नाही. इस्राइलचे पाणी वाटपाचे तंत्र आपण वापरले तर तिप्पट पाणी मिळेल. 

- उसासाठी शेतीला वारेमाप पाणी दिले जाते. हे तर असे आहे की श्रीमंत माणसाला डायबिटीस झाला आहे आणि कोरडवाहू शेतकरी जगू शकत नाही. हा बागायती आणि कोरडवाहू शेतीतील फरक आहे.   

टॅग्स :literatureसाहित्यMLAआमदारMaharashtraमहाराष्ट्र