शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 07:36 IST

मराठवाड्यातील ७५ मंडळांत कहर, विसर्ग वाढविल्याने अनेक गावांमध्ये पूर, घरे बुडाली

छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे मराठवाड्यात अक्षरश: कहर केला आहे. बीड, धाराशिव, हिंगोली, जालना जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. प्रकल्पांमधून विसर्ग सोडल्याने गावागावांमध्ये पाणी शिरले आहे. उरलीसुरली पिकेही खरडून निघाली आहेत.

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत ५ हजार ३२० गावांतील पिकांचा चिखल केला. २२ सप्टेंबरला एकाच दिवसात तब्बल ७५ महसूल मंडळांत अतिवृष्टी होण्याचा यंदा विक्रम झाला आहे. दोन दिवसांत विविध जिल्ह्यात २२ गावांचा संपर्क तुटला. ७० जणांना सुरक्षित ठिकाणी हलविले.  सिंदफनाने ५० वर्षांचा विक्रम मोडला : शिरूरला सिंदफना नदीला महापूर आला. यामुळे ५० वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले. घरे पाण्याखाली गेल्याने शेकडो संसार उद्ध्वस्त झाले.      

बांधलेली जनावरे दगावली : पिंपळगाव (ता. भूम) गोठ्यात पुराचे पाणी शिरल्याने बांधलेल्या १६ गायींचा जागेवरच मृत्यू झाला. गावात ६५ तर अंतरगाव येथे १२ जनावरे दगावली. परभणीत पुरात तरुण बेपत्ता झाला. तर जालन्यात  पुरात अडकलेल्या १४ जणांची सुटका करण्यात आली. 

हेलिकॉप्टरने काढले ६० नागरिकांना सुखरूप   धाराशिव इथे रात्रीतून पावसाने कहर केला. २२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. तसेच परंडा तालुक्यात नद्यांना महापूर आहे. पुराचे पाणी सुमारे २० पेक्षा अधिक गावांमध्ये शिरले. यामुळे पुरात अडकलेल्या ६० नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले. बोटीद्वारेही शेकडो नागरिकांना वाचविण्यात आले.

शेतकऱ्यांना आवाहन २७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते.२८ तारखेला पश्चिम भागात जोर कायम राहू शकतो. संभाव्य स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले. 

संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर वाढणार जोरपुणे / मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील ३ दिवसात हलका ते मध्यम आणि २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.  मंगळवारी (दि. २३) कोकण, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बुधवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्यामुळे मॉन्सून सक्रिय राहील, परतीच्या प्रवासाबाबत अंदाज वर्तविणे शक्य नसल्याचे डॉ. सानप यांनी स्पष्ट केले. 

जळगावात रस्ते बंद, जिल्हाधिकारीही अडकलेजळगाव/अहिल्यानगर : जिल्ह्यात परतीच्या पावसाचे तडाखे सुरूच आहेत. भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी शिरले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगावहून पाचोऱ्याकडे जात असताना पुरामुळे त्यांचा ताफा थांबला. काही तरुण दुचाकी पाण्यातून नेण्याचा प्रयत्न करत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अडविले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाने धुमाकूळ घातला. २४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे नद्यांना पूर आले.

विदर्भात पिकांचा चिखल  चंद्रपूर : सप्टेंबरमध्ये ३६३०.५८ हेक्टरवर नुकसान. ५,२६५ शेतकरी बाधित.    गडचिरोली : जुलै व ऑगस्टमध्ये ११,६३९.७५ हेक्टरवर हानी. १८ हजार ९१९ शेतकरी बाधित.  यवतमाळ : अतिवृष्टीमुळे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान. १७३७ गावांत फटका.   वर्धा : तीन महिन्यात २१,५०६.५६ हेक्टरवर नुकसान, २९ हजार ६७० शेतकऱ्यांना बसला. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर