शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

"...ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे", संजय राऊतांना रवी राणांचे प्रत्युत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 14:45 IST

ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. या घटनेवर भाष्य करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात, असे म्हटले आहे. तर ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबईपासून विदर्भाला जोडणारा मार्ग आहे. टेक्निकल टीमने बसून यावर अभ्यास केला पाहिजे. संजय राऊत ज्या मार्गाला शापित म्हणतात, त्या मार्गाच नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. त्याला शापित म्हणणं हे चुकीचे आहे आणि संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसाठी शापित आहेत, असे म्हणत रवी राणा यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

याचबरोबर, रवी राणा यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांनीही संजय राऊतांच्या विधानावर पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या की, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंसाठी शापित आहेत. तर या अपघातावर राजकारण करू नये. तसेच, राजकारण करणाऱ्याचे दु:ख वाटते, तर संजय राऊत यांच्या बातम्या माध्यमांनी दाखवू नये. वारंवार होत असलेल्या अपघातावर तज्ज्ञ लोकांनी अभ्यास करावा. तसेच,येणाऱ्या काळात समृद्धी महामार्गावरील अपघात कसे थांबतील याकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लक्ष देतील, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

काय म्हणाले संजय राऊत?समृद्धी महामार्गावर झालेला अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या अपघातामधील मोठा अपघात आहे. समृद्धीवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. २५ लोक ज्या पद्धतीने मरण पावले हे दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला त्याच्या खोलात जावे लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने निर्णय केले. त्या अनेक गोष्टी तपासाव्या लागतील. भविष्यात त्या सर्व गोष्टी समोर येतील. दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, लोक मृत्यू होत आहेत हे काही चांगले नाही, किती वेळा श्रद्धांजली वहायच्या, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, वेग मर्यादेसंदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली. त्यासंदर्भात काही होत नाही. समृद्धी महामार्ग भ्रष्टाचाराने तयार झाला आहे. अनेकांच्या जमिनी त्यासाठी हडप करण्यात आल्या जबरदस्तीने घेण्यात आल्या. अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये मला दिसतात आणि म्हणून तर अपघात होत नाहीत ना, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघातदरम्यान, विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbuldhanaबुलडाणाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गRavi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणा