शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 06:04 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुती बहुमताने सरकार स्थापन करणार  : एकनाथ शिंदे, मतटक्का वाढल्याचा महायुतीलाच फायदा: देवेंद्र फडणवीस, मविआचा नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार : नाना पटोले.

मुंबई/नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आपलीच सत्ता येणार असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. या नेत्यांचे दावे किती खरे किती खोटे याची स्पष्टता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर बुधवारी सकाळी येणार आहे.

जनता महायुतीच्या बाजूने; मुख्यमंत्र्यांचा दावा 

गेल्या पाच वर्षांचा कारभार महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे. २०१९ मध्ये चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झाले. ती घटना जनता अद्याप विसरलेली नाही. 

जनता भरभरून विकासाला मतदान करेल. पूर्ण बहुमताचे महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आम्ही लाडकी बहीणसह अनेक योजना सुरू केल्या. सर्वसामान्य, शेतकरी, कामगार व ज्येष्ठांसाठी योजना घोषित केल्या. या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी महायुतीने प्रयत्न केले. त्यामुळे जनता आमच्या बाजूने उभी आहे, असेही शिंदे म्हणाले.

टक्केवारीतील वाढ हा ‘प्रो इन्कबन्सी फॅक्टर’ 

राज्यात मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा भाजप व मित्रपक्षांना फायदाच होईल व महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. 

मतदानाची टक्केवारी वाढली की भाजप व मित्रपक्षांना त्याचा फायदा होतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे. टक्केवारी वाढल्याने हा ‘प्रो इन्कबन्सी फॅक्टर’ आहे. सरकारबाबत आपुलकी वाढली आहे. महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, असे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे, असे फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्रिपदाबाबत निकाल आल्यानंतर तीनही पक्षांचे नेते बसतील व योग्य निर्णय घेतील. कुठल्याही अपक्षांशी अद्याप संपर्क साधला नसल्याचेही फडणवीस म्हणाले. 

आम्ही १०५ पेक्षा जास्त जागा जिंकू. तिघांचे आमदार मिळून बहुमत नक्की मिळेल. अपक्षांची गरज भासली नाही, तरी त्यांना सोबत घेऊ, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.   

मतदानासाठी जनतेचा दांडगा उत्साह दिसून आला. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल आणि काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. २५ नोव्हेंबरला आघाडीचा नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

एक्झिट पोल फ्रॉड आहेत. हरयाणामध्ये काँग्रेस ६० च्या वर जागा जिंकेल, तर लोकसभेला भाजप ४०० पार जाईल असा एक्झिट पोल होता, पण काय झाले? राज्यात महाविकास आघाडीला १६० पेक्षा जास्त जागा मिळतील, बहुमत आमच्याकडेच असेल. त्यामुळे निकालाच्या दिवशी २३ तारखेलाही आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. - संजय राऊत, नेते, उद्धवसेना

मोठ्या बहुमताने महाविकास आघाडीचे सरकार येईल. भाजपचा राष्ट्रीय नेता पैशांसोबत सापडतो याने सिद्ध होते की, भाजप या निवडणुकीत काय करत आहे. हे महाराष्ट्राला खरेदी करायला निघाले आहेत. २३ तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा कळेल की, महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमानाने जपणारे राज्य आहे. -जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट

मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये तीन संस्थांनी महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. मलाही विश्वास आहे महायुतीचे शतप्रतिशत सरकार येईल. -छगन भुजबळ, नेते अजित पवार गट

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊत