शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 06:04 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुती बहुमताने सरकार स्थापन करणार  : एकनाथ शिंदे, मतटक्का वाढल्याचा महायुतीलाच फायदा: देवेंद्र फडणवीस, मविआचा नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार : नाना पटोले.

मुंबई/नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आपलीच सत्ता येणार असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. या नेत्यांचे दावे किती खरे किती खोटे याची स्पष्टता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर बुधवारी सकाळी येणार आहे.

जनता महायुतीच्या बाजूने; मुख्यमंत्र्यांचा दावा 

गेल्या पाच वर्षांचा कारभार महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे. २०१९ मध्ये चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झाले. ती घटना जनता अद्याप विसरलेली नाही. 

जनता भरभरून विकासाला मतदान करेल. पूर्ण बहुमताचे महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आम्ही लाडकी बहीणसह अनेक योजना सुरू केल्या. सर्वसामान्य, शेतकरी, कामगार व ज्येष्ठांसाठी योजना घोषित केल्या. या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी महायुतीने प्रयत्न केले. त्यामुळे जनता आमच्या बाजूने उभी आहे, असेही शिंदे म्हणाले.

टक्केवारीतील वाढ हा ‘प्रो इन्कबन्सी फॅक्टर’ 

राज्यात मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा भाजप व मित्रपक्षांना फायदाच होईल व महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. 

मतदानाची टक्केवारी वाढली की भाजप व मित्रपक्षांना त्याचा फायदा होतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे. टक्केवारी वाढल्याने हा ‘प्रो इन्कबन्सी फॅक्टर’ आहे. सरकारबाबत आपुलकी वाढली आहे. महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, असे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे, असे फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्रिपदाबाबत निकाल आल्यानंतर तीनही पक्षांचे नेते बसतील व योग्य निर्णय घेतील. कुठल्याही अपक्षांशी अद्याप संपर्क साधला नसल्याचेही फडणवीस म्हणाले. 

आम्ही १०५ पेक्षा जास्त जागा जिंकू. तिघांचे आमदार मिळून बहुमत नक्की मिळेल. अपक्षांची गरज भासली नाही, तरी त्यांना सोबत घेऊ, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.   

मतदानासाठी जनतेचा दांडगा उत्साह दिसून आला. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल आणि काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. २५ नोव्हेंबरला आघाडीचा नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

एक्झिट पोल फ्रॉड आहेत. हरयाणामध्ये काँग्रेस ६० च्या वर जागा जिंकेल, तर लोकसभेला भाजप ४०० पार जाईल असा एक्झिट पोल होता, पण काय झाले? राज्यात महाविकास आघाडीला १६० पेक्षा जास्त जागा मिळतील, बहुमत आमच्याकडेच असेल. त्यामुळे निकालाच्या दिवशी २३ तारखेलाही आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. - संजय राऊत, नेते, उद्धवसेना

मोठ्या बहुमताने महाविकास आघाडीचे सरकार येईल. भाजपचा राष्ट्रीय नेता पैशांसोबत सापडतो याने सिद्ध होते की, भाजप या निवडणुकीत काय करत आहे. हे महाराष्ट्राला खरेदी करायला निघाले आहेत. २३ तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा कळेल की, महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमानाने जपणारे राज्य आहे. -जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट

मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये तीन संस्थांनी महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. मलाही विश्वास आहे महायुतीचे शतप्रतिशत सरकार येईल. -छगन भुजबळ, नेते अजित पवार गट

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊत