शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
3
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
4
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
5
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
6
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
7
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
8
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
10
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
11
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
12
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
13
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
14
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
16
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
17
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
18
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
19
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
20
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच नाही मविआच्या काळातही महिला अत्याचार घटनांनी गाठला होता कळस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 20:55 IST

बदलापूर अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवरीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे

Maharashtra Women Safety NCRB Report : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. याप्रकरणी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आलीय. बदलापुरच्या या घटनेनंतर राज्यात आणखी अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. अशातच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून महाराष्ट्राबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असो किंवा महायुतीचे महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचारांमध्ये दोघांच्या काळात कोणताही बदल झाला नसल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आलं आहे.

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. या घटनेच्या संदर्भात एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीतून महाराष्ट्रात महिलांवर खुलेआम होणाऱ्या अत्याचाराचे भीषण सत्य समोर आले आहे. 2२०२१ मध्ये कोविड-१९ च्या काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिलांवरील गुन्ह्यांच्या संख्येत कोणतीही घट झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात दररोज सरासरी १०९ महिला अत्याचाराला बळी पडत होत्या. आजही परिस्थिती तशीच असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आलं आहे. २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांत, ही संख्या १२६ पर्यंत वाढली. २०२३ मध्येही परिस्थिती अशीच होती.

एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीनुसार,  लॉकडाऊन दरम्यान महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले आहे. २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान, महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या ३१,७०१ गुन्ह्यांची नोंद झाली. याचा अर्थ दररोज सरासरी ८८ महिला अत्याचाराच्या बळी ठरत होत्या. २०२१ मध्ये ही संख्या ३९,२६६ पर्यंत वाढली. त्यावेळी दररोज १०९ महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या होत्या.

जानेवारी ते जून २०२२ या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात दररोज १२६ महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. तर जुलै ते डिसेंबर २०२२ मध्ये महायुती सरकारच्या काळात ही संख्या थोडी कमी होऊन ११६ वर आली. मात्र, २०२३ मध्ये ही सरासरी पुन्हा १२६ वर पोहोचल्याने राज्यातील महिलांच्या सुरक्षेची स्थिती अजूनही गंभीर असल्याचे स्पष्ट झालं. दुसरीकडे, अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०२१ पर्यंत ही संख्या २४९ वर पोहोचली होती आणि २०२२ मध्ये ती ३३२ पर्यंत वाढली होती.

मुंबईत २०२३ मध्ये पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराच्या घटनांमध्ये थोडीशी घट झाली आहे. २०२० मध्ये पोस्कोची ४४५ प्रकरणे नोंदवली गेली. तर २०२१ मध्ये ही संख्या ५२४ वर पोहोचली होती. २०२३ मध्ये हा आकडा ५९० वर पोहोचला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये कोणतीही लक्षणीय घट झाली नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. काही घटनांमध्ये वाढ तर काही घटली असली तरी एकूण परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि परिणामकारक उपाययोजनांची तातडीने गरज असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीCrime Newsगुन्हेगारी