शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

शिंदेंच्या सहमतीनेच फडणवीसांनी लिहिलं पत्र; मलिकांवरून अजित पवार गटाची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 12:11 IST

मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. 

नागपूर - हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून नागपूर येथे सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक विधानभवनात पोहचले. त्यानंतर सभागृहात नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचं म्हटलं गेले. परंतु यावर भाजपा आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांना जाहीर पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. 

आता देवेंद्र फडणवीसांच्या या पत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहमती दिल्याचे समोर आले आहे. नवाब मलिक सत्तेसोबत असणे अयोग्य असल्याचं शिंदे म्हणाले. नागपूर येथे सभागृहाचं कामकाज संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यावेळी शिंदे-फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याची भूमिका आपण खपवून घ्यायला नको.आपल्याला भूमिका जाहीर करावी लागेल अशी चर्चा झाली. त्यानंतर संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून भाजपाची भूमिका अजित पवारांना कळवली. त्यानंतर शिवसेना आमदारांनीही त्यांची भूमिका मांडली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांची भूमिका योग्यच आहे. आमचादेखील त्यांना पाठींबा आहे. ज्या गोष्टीच्या विरोधात आम्ही आधी होतो त्याच गोष्टीला आजही आमचा विरोध आहे असं त्यांनी म्हटलं. ABP माझानं अशी बातमी दिलीय. तर देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं असून मी ते पत्र वाचलं आहे.२ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या सर्व घडामोडीनंतर नवाब मलिक हे कालच पहिल्यांदा सभागृहात आले आणि ते कुठे बसले हे सर्वांना माहीत आहे.मात्र त्यांनी स्पष्टपणे या सगळ्या घडामोडींबाबत भूमिका मांडलेली नाही. मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. 

देवेंद्र फडणवीस पत्रात काय म्हणाले?"नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो" असं म्हणत नवाब मलिकांना महायुतीपासून दूर ठेवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिक