शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शिंदेंच्या सहमतीनेच फडणवीसांनी लिहिलं पत्र; मलिकांवरून अजित पवार गटाची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 12:11 IST

मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. 

नागपूर - हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून नागपूर येथे सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक विधानभवनात पोहचले. त्यानंतर सभागृहात नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचं म्हटलं गेले. परंतु यावर भाजपा आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांना जाहीर पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. 

आता देवेंद्र फडणवीसांच्या या पत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहमती दिल्याचे समोर आले आहे. नवाब मलिक सत्तेसोबत असणे अयोग्य असल्याचं शिंदे म्हणाले. नागपूर येथे सभागृहाचं कामकाज संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यावेळी शिंदे-फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याची भूमिका आपण खपवून घ्यायला नको.आपल्याला भूमिका जाहीर करावी लागेल अशी चर्चा झाली. त्यानंतर संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून भाजपाची भूमिका अजित पवारांना कळवली. त्यानंतर शिवसेना आमदारांनीही त्यांची भूमिका मांडली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांची भूमिका योग्यच आहे. आमचादेखील त्यांना पाठींबा आहे. ज्या गोष्टीच्या विरोधात आम्ही आधी होतो त्याच गोष्टीला आजही आमचा विरोध आहे असं त्यांनी म्हटलं. ABP माझानं अशी बातमी दिलीय. तर देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं असून मी ते पत्र वाचलं आहे.२ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या सर्व घडामोडीनंतर नवाब मलिक हे कालच पहिल्यांदा सभागृहात आले आणि ते कुठे बसले हे सर्वांना माहीत आहे.मात्र त्यांनी स्पष्टपणे या सगळ्या घडामोडींबाबत भूमिका मांडलेली नाही. मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. 

देवेंद्र फडणवीस पत्रात काय म्हणाले?"नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो" असं म्हणत नवाब मलिकांना महायुतीपासून दूर ठेवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिक