शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंच्या सहमतीनेच फडणवीसांनी लिहिलं पत्र; मलिकांवरून अजित पवार गटाची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 12:11 IST

मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. 

नागपूर - हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून नागपूर येथे सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक विधानभवनात पोहचले. त्यानंतर सभागृहात नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचं म्हटलं गेले. परंतु यावर भाजपा आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांना जाहीर पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. 

आता देवेंद्र फडणवीसांच्या या पत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहमती दिल्याचे समोर आले आहे. नवाब मलिक सत्तेसोबत असणे अयोग्य असल्याचं शिंदे म्हणाले. नागपूर येथे सभागृहाचं कामकाज संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यावेळी शिंदे-फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याची भूमिका आपण खपवून घ्यायला नको.आपल्याला भूमिका जाहीर करावी लागेल अशी चर्चा झाली. त्यानंतर संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून भाजपाची भूमिका अजित पवारांना कळवली. त्यानंतर शिवसेना आमदारांनीही त्यांची भूमिका मांडली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांची भूमिका योग्यच आहे. आमचादेखील त्यांना पाठींबा आहे. ज्या गोष्टीच्या विरोधात आम्ही आधी होतो त्याच गोष्टीला आजही आमचा विरोध आहे असं त्यांनी म्हटलं. ABP माझानं अशी बातमी दिलीय. तर देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं असून मी ते पत्र वाचलं आहे.२ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या सर्व घडामोडीनंतर नवाब मलिक हे कालच पहिल्यांदा सभागृहात आले आणि ते कुठे बसले हे सर्वांना माहीत आहे.मात्र त्यांनी स्पष्टपणे या सगळ्या घडामोडींबाबत भूमिका मांडलेली नाही. मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. 

देवेंद्र फडणवीस पत्रात काय म्हणाले?"नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो" असं म्हणत नवाब मलिकांना महायुतीपासून दूर ठेवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिक