शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

CM पदाचा चेहरा, मविआत चढाओढ; उद्धव ठाकरेंसह बरेच इच्छुक, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:53 IST

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणायचा की नाही यावर सध्या निर्णय नाही. मात्र उद्धव ठाकरे हे मविआचा चेहरा बनण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. 

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी ३ दिवसीय दिल्ली दौरा केला. या दौऱ्यातून उद्धव ठाकरे स्वत:ला मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतायेत अशी चर्चा सुरू होती. विरोधकांनीही यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मात्र महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे करण्याची गरज नाही असं सांगत ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केले आहे. 

पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे दिल्लीत गेले, त्यांची काय चर्चा झाली माहिती नाही. विरोधी पक्ष म्हणून जेव्हा आपण निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा कुणीही चेहरा प्रोजेक्ट करत नाही अशी महाराष्ट्रात परंपरा आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर निवडणूक लढणार आहोत. सत्तेत आल्यानंतर तो जाहिरनामा पूर्ण करणार आहोत. त्यामुळे चेहरा पुढे करण्याची परंपरा नाही आणि त्याला मान्यता मिळेल असंही वाटत नसल्याचं त्यांनी स्पष्टच सांगितले.

त्याशिवाय निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, मग मुख्यमंत्रिपद कोणत्या व्यक्तीला द्यायचं हे त्या पक्षाचे श्रेष्ठी ठरवतात. त्यामुळे यंदा काही वेगळं घडेल असं वाटत नाही. जाहीरनामा हा चेहरा नाही तर कार्यक्रम आहे. आम्ही त्या कार्यक्रमावर निवडणूक लढणार आहोत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची काही गरज नाही.  निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवला जाईल. त्यावेळी जो पक्ष मोठा असेल त्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री ठरवतील असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे तुम्हाला भविष्यात कळेल. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत असताना कुठलाही मोठा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय जर जाहीर केला तर ते चार भिंतीत ठरलेल्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं होईल. आम्ही एकमेकांची बोलूनच निर्णय घेऊ आणि ते सांगू असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मीही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक, पण...

महाविकास आघाडीत एखादा चेहरा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत आम्ही अजून चर्चा केली नाही. उद्धव ठाकरे हे मविआचे प्रमुख नेते आहेत. लोकसभेला महाराष्ट्रात फिरून त्यांनी समाज जागरुक केला. त्यांच्या पक्षाचे नेते ते आहेत पण आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांनाही महाराष्ट्रात तेवढेच महत्त्व आहे. इतकी वर्ष राजकारणात घालवून शरद पवारांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहचलो. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण शेवटी व्यवहारी भूमिका राजकारणात असणं आवश्यक आहे. काँग्रेसमध्ये २-३ जण आहेत, राष्ट्रवादीत १-२ जण आहेत, शिवसेनेत काही आहेत प्रत्येकाची इच्छा असते. महायुतीतही ५-६ जण आहेत. परंतु संख्या किती याला राजकारणात महत्त्व आहे असं विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.  

विरोधकांचा महाविकास आघाडीवर निशाणा

महाविकास आघाडीतील मतभेद आता तर वरवर दिसताहेत. पुढे ते टोकाचे होणार आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यासाठी गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले मुख्यमंत्री पदाचा आमचा चेहरा नंतर ठरवला जाईल. यावरून महाविकास आघाडीत विधानसभेत भविष्यात काय वाढलेय हे तुमच्या लक्षात येईल असा निशाणा भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी साधला.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतJayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस