शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

CM पदाचा चेहरा, मविआत चढाओढ; उद्धव ठाकरेंसह बरेच इच्छुक, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:53 IST

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणायचा की नाही यावर सध्या निर्णय नाही. मात्र उद्धव ठाकरे हे मविआचा चेहरा बनण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. 

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी ३ दिवसीय दिल्ली दौरा केला. या दौऱ्यातून उद्धव ठाकरे स्वत:ला मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतायेत अशी चर्चा सुरू होती. विरोधकांनीही यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मात्र महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे करण्याची गरज नाही असं सांगत ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केले आहे. 

पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे दिल्लीत गेले, त्यांची काय चर्चा झाली माहिती नाही. विरोधी पक्ष म्हणून जेव्हा आपण निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा कुणीही चेहरा प्रोजेक्ट करत नाही अशी महाराष्ट्रात परंपरा आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर निवडणूक लढणार आहोत. सत्तेत आल्यानंतर तो जाहिरनामा पूर्ण करणार आहोत. त्यामुळे चेहरा पुढे करण्याची परंपरा नाही आणि त्याला मान्यता मिळेल असंही वाटत नसल्याचं त्यांनी स्पष्टच सांगितले.

त्याशिवाय निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, मग मुख्यमंत्रिपद कोणत्या व्यक्तीला द्यायचं हे त्या पक्षाचे श्रेष्ठी ठरवतात. त्यामुळे यंदा काही वेगळं घडेल असं वाटत नाही. जाहीरनामा हा चेहरा नाही तर कार्यक्रम आहे. आम्ही त्या कार्यक्रमावर निवडणूक लढणार आहोत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची काही गरज नाही.  निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवला जाईल. त्यावेळी जो पक्ष मोठा असेल त्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री ठरवतील असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे तुम्हाला भविष्यात कळेल. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत असताना कुठलाही मोठा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय जर जाहीर केला तर ते चार भिंतीत ठरलेल्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं होईल. आम्ही एकमेकांची बोलूनच निर्णय घेऊ आणि ते सांगू असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मीही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक, पण...

महाविकास आघाडीत एखादा चेहरा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत आम्ही अजून चर्चा केली नाही. उद्धव ठाकरे हे मविआचे प्रमुख नेते आहेत. लोकसभेला महाराष्ट्रात फिरून त्यांनी समाज जागरुक केला. त्यांच्या पक्षाचे नेते ते आहेत पण आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांनाही महाराष्ट्रात तेवढेच महत्त्व आहे. इतकी वर्ष राजकारणात घालवून शरद पवारांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहचलो. त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण शेवटी व्यवहारी भूमिका राजकारणात असणं आवश्यक आहे. काँग्रेसमध्ये २-३ जण आहेत, राष्ट्रवादीत १-२ जण आहेत, शिवसेनेत काही आहेत प्रत्येकाची इच्छा असते. महायुतीतही ५-६ जण आहेत. परंतु संख्या किती याला राजकारणात महत्त्व आहे असं विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.  

विरोधकांचा महाविकास आघाडीवर निशाणा

महाविकास आघाडीतील मतभेद आता तर वरवर दिसताहेत. पुढे ते टोकाचे होणार आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यासाठी गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले मुख्यमंत्री पदाचा आमचा चेहरा नंतर ठरवला जाईल. यावरून महाविकास आघाडीत विधानसभेत भविष्यात काय वाढलेय हे तुमच्या लक्षात येईल असा निशाणा भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी साधला.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतJayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस