शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 07:39 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ म्हणत विविध सभांमधून भाषणे दिली होती. भाजपच्या अन्य नेत्यांनीही हाच नारा दिला होता.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात विद्वेष पसरविणारी नेत्यांची विधाने आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रडारवर आली आहेत. त्यात ‘बटेंगे तो कटेंगे’सह मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या भावना भडकविणाऱ्या विधानांचाही समावेश आहे. असे सगळेच नारे, विधाने याबाबत मुंबईतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केंद्रीय मुख्य आयुक्तांकडे अहवाल पाठविले आहेत. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ म्हणत विविध सभांमधून भाषणे दिली होती. भाजपच्या अन्य नेत्यांनीही हाच नारा दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादविरुद्ध धर्मयुद्ध पुकारण्याचे आवाहन केले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करताना सज्जाद नोमानी यांनी भाजपला मते देणाऱ्या मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा, असे म्हटले होते. तसेच मशिदींवर बुलडोझर चालविणाऱ्यांना मते देणार का, असा सवालही केला होता. 

मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने ‘लोकमत’ला सांगितले की, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सर्वच वक्तव्यांबद्दलचे अहवाल केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आम्ही पाठविले आहेत. असे साधारणत: १५ अहवाल आहेत. काहींबाबत केंद्रीय आयोगाने आमच्याकडून अहवाल मागविले होते, काहींबाबत आम्ही स्वत:हून अहवाल पाठविले आहेत. त्यावर काय कारवाई करायची याचा अधिकार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना असतात. सर्व प्रकारच्या बाबी तपासून कारवाई केली जाते.  

मतदानाच्या एकाच दिवसात दीडशे गुन्हे दाखल

३५ दिवसांच्या आचारसंहिता काळात निवडणुकीशी संबंधित ५०९ गुन्हे दाखल झाले आणि मतदानाच्या एकाच दिवसात बुधवारी १५० गुन्हे दाखल करण्यात आले.

एकूण ७०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १२३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. गेल्यावेळेपेक्षा यंदा ५८३ कोटी रुपये अधिकची मालमत्ता (पैसे, दारू आदी) जप्त करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री शिंदे यांना केली होती आयोगाने मनाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळी, भायखळा, चांदिवली अशा काही मतदारसंघांमध्ये मतदानाच्या दिवशी फिरले. 

प्रत्यक्षात ठाण्यातील त्यांच्या मतदारसंघातून ते वर्षा बंगल्यावर मतदानाच्या काळात जाऊ शकतील का, याची विचारणा त्यांच्या कार्यालयाने आयोगाकडे केलेली होती.

आम्ही त्यांना मतदारसंघातच थांबण्यास सांगितले होते. मात्र, ते अन्य मतदारसंघांमध्ये गेले होते का याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस