शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 07:39 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ म्हणत विविध सभांमधून भाषणे दिली होती. भाजपच्या अन्य नेत्यांनीही हाच नारा दिला होता.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात विद्वेष पसरविणारी नेत्यांची विधाने आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रडारवर आली आहेत. त्यात ‘बटेंगे तो कटेंगे’सह मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या भावना भडकविणाऱ्या विधानांचाही समावेश आहे. असे सगळेच नारे, विधाने याबाबत मुंबईतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केंद्रीय मुख्य आयुक्तांकडे अहवाल पाठविले आहेत. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ म्हणत विविध सभांमधून भाषणे दिली होती. भाजपच्या अन्य नेत्यांनीही हाच नारा दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादविरुद्ध धर्मयुद्ध पुकारण्याचे आवाहन केले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करताना सज्जाद नोमानी यांनी भाजपला मते देणाऱ्या मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा, असे म्हटले होते. तसेच मशिदींवर बुलडोझर चालविणाऱ्यांना मते देणार का, असा सवालही केला होता. 

मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने ‘लोकमत’ला सांगितले की, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सर्वच वक्तव्यांबद्दलचे अहवाल केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आम्ही पाठविले आहेत. असे साधारणत: १५ अहवाल आहेत. काहींबाबत केंद्रीय आयोगाने आमच्याकडून अहवाल मागविले होते, काहींबाबत आम्ही स्वत:हून अहवाल पाठविले आहेत. त्यावर काय कारवाई करायची याचा अधिकार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना असतात. सर्व प्रकारच्या बाबी तपासून कारवाई केली जाते.  

मतदानाच्या एकाच दिवसात दीडशे गुन्हे दाखल

३५ दिवसांच्या आचारसंहिता काळात निवडणुकीशी संबंधित ५०९ गुन्हे दाखल झाले आणि मतदानाच्या एकाच दिवसात बुधवारी १५० गुन्हे दाखल करण्यात आले.

एकूण ७०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १२३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. गेल्यावेळेपेक्षा यंदा ५८३ कोटी रुपये अधिकची मालमत्ता (पैसे, दारू आदी) जप्त करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री शिंदे यांना केली होती आयोगाने मनाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळी, भायखळा, चांदिवली अशा काही मतदारसंघांमध्ये मतदानाच्या दिवशी फिरले. 

प्रत्यक्षात ठाण्यातील त्यांच्या मतदारसंघातून ते वर्षा बंगल्यावर मतदानाच्या काळात जाऊ शकतील का, याची विचारणा त्यांच्या कार्यालयाने आयोगाकडे केलेली होती.

आम्ही त्यांना मतदारसंघातच थांबण्यास सांगितले होते. मात्र, ते अन्य मतदारसंघांमध्ये गेले होते का याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस