शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 07:39 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ म्हणत विविध सभांमधून भाषणे दिली होती. भाजपच्या अन्य नेत्यांनीही हाच नारा दिला होता.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात विद्वेष पसरविणारी नेत्यांची विधाने आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रडारवर आली आहेत. त्यात ‘बटेंगे तो कटेंगे’सह मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या भावना भडकविणाऱ्या विधानांचाही समावेश आहे. असे सगळेच नारे, विधाने याबाबत मुंबईतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केंद्रीय मुख्य आयुक्तांकडे अहवाल पाठविले आहेत. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ म्हणत विविध सभांमधून भाषणे दिली होती. भाजपच्या अन्य नेत्यांनीही हाच नारा दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादविरुद्ध धर्मयुद्ध पुकारण्याचे आवाहन केले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करताना सज्जाद नोमानी यांनी भाजपला मते देणाऱ्या मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा, असे म्हटले होते. तसेच मशिदींवर बुलडोझर चालविणाऱ्यांना मते देणार का, असा सवालही केला होता. 

मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने ‘लोकमत’ला सांगितले की, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सर्वच वक्तव्यांबद्दलचे अहवाल केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आम्ही पाठविले आहेत. असे साधारणत: १५ अहवाल आहेत. काहींबाबत केंद्रीय आयोगाने आमच्याकडून अहवाल मागविले होते, काहींबाबत आम्ही स्वत:हून अहवाल पाठविले आहेत. त्यावर काय कारवाई करायची याचा अधिकार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना असतात. सर्व प्रकारच्या बाबी तपासून कारवाई केली जाते.  

मतदानाच्या एकाच दिवसात दीडशे गुन्हे दाखल

३५ दिवसांच्या आचारसंहिता काळात निवडणुकीशी संबंधित ५०९ गुन्हे दाखल झाले आणि मतदानाच्या एकाच दिवसात बुधवारी १५० गुन्हे दाखल करण्यात आले.

एकूण ७०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १२३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. गेल्यावेळेपेक्षा यंदा ५८३ कोटी रुपये अधिकची मालमत्ता (पैसे, दारू आदी) जप्त करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री शिंदे यांना केली होती आयोगाने मनाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळी, भायखळा, चांदिवली अशा काही मतदारसंघांमध्ये मतदानाच्या दिवशी फिरले. 

प्रत्यक्षात ठाण्यातील त्यांच्या मतदारसंघातून ते वर्षा बंगल्यावर मतदानाच्या काळात जाऊ शकतील का, याची विचारणा त्यांच्या कार्यालयाने आयोगाकडे केलेली होती.

आम्ही त्यांना मतदारसंघातच थांबण्यास सांगितले होते. मात्र, ते अन्य मतदारसंघांमध्ये गेले होते का याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस