शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 05:22 IST

मुंबई व महाराष्ट्राची संपत्ती लुटणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवा; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची लढाई एक-दोन उद्योगपती आणि राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून, ती लुटण्याचे काम सुरू आहे. धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील एक लाख कोटी रुपये किमतीची जमीन एका व्यक्तीला दिली जात आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधत मविआ सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील जनतेसाठी काय करणार, याची माहिती दिली.

मुंबईतील धारावी ही लघू व मध्यम उद्योगाचे हब आहे. हे हब बंद करून धारावी अदानींच्या घशात घालण्यास सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. हा फक्त धारावी पुरता मुद्दा नसून मुंबई, मुंबईचे पर्यावरण यांच्याशीही संबंधित आहे. देशातील विमानतळे, संरक्षण साहित्य बनविण्याचे काम, बंदरे, ऊर्जा निर्मिती प्रकल्प सर्वकाही एकाच व्यक्तीच्या हातात देण्यासाठी भाजप सरकार काम करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, सोयाबीन, कापूसाला भाव नाही, तर बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. भाजप सरकारने नोकरभरती न करता महाराष्ट्रात येणारे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क ड्रग प्रकल्प, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र सारखे तब्बल ७ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे प्रकल्प राज्याबाहेर घालविले. ५ लाख युवकांचे रोजगारही  बाहेर गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

- मविआची सत्ता आल्यानंतर महिलांना महिना ३ हजार, एसटीचा मोफत प्रवास, शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ, सोयाबीनला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव, कापसाला योग्य भाव, राजस्थानच्या धर्तीवर २५ लाखांचा आरोग्य विमा देणार.

- बेरोजगारांना महिना ४ हजारांचा भत्ता, अडीच लाख रिक्त सरकारी पदांची भरती, जातनिहाय जनगणना, ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटविणे यावरही भर दिला जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसच्या गॅरंटी व मविआच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यात कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. - राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीMahayutiमहायुतीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस