शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 05:22 IST

मुंबई व महाराष्ट्राची संपत्ती लुटणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवा; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची लढाई एक-दोन उद्योगपती आणि राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून, ती लुटण्याचे काम सुरू आहे. धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील एक लाख कोटी रुपये किमतीची जमीन एका व्यक्तीला दिली जात आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधत मविआ सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील जनतेसाठी काय करणार, याची माहिती दिली.

मुंबईतील धारावी ही लघू व मध्यम उद्योगाचे हब आहे. हे हब बंद करून धारावी अदानींच्या घशात घालण्यास सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. हा फक्त धारावी पुरता मुद्दा नसून मुंबई, मुंबईचे पर्यावरण यांच्याशीही संबंधित आहे. देशातील विमानतळे, संरक्षण साहित्य बनविण्याचे काम, बंदरे, ऊर्जा निर्मिती प्रकल्प सर्वकाही एकाच व्यक्तीच्या हातात देण्यासाठी भाजप सरकार काम करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, सोयाबीन, कापूसाला भाव नाही, तर बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. भाजप सरकारने नोकरभरती न करता महाराष्ट्रात येणारे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क ड्रग प्रकल्प, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र सारखे तब्बल ७ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे प्रकल्प राज्याबाहेर घालविले. ५ लाख युवकांचे रोजगारही  बाहेर गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

- मविआची सत्ता आल्यानंतर महिलांना महिना ३ हजार, एसटीचा मोफत प्रवास, शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ, सोयाबीनला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव, कापसाला योग्य भाव, राजस्थानच्या धर्तीवर २५ लाखांचा आरोग्य विमा देणार.

- बेरोजगारांना महिना ४ हजारांचा भत्ता, अडीच लाख रिक्त सरकारी पदांची भरती, जातनिहाय जनगणना, ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटविणे यावरही भर दिला जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेसच्या गॅरंटी व मविआच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यात कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. - राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीMahayutiमहायुतीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस