शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

राष्ट्रवादीने 'यामुळे' नाकारलं होतं मुख्यमंत्रीपद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 13:23 IST

अजित पवारांना दोनवेळा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. किंबहुना त्यामुळेच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र मात्र भाजपसोबत जाण्याच्या एकतर्फी निर्णयामुळे अजित पवार आता उपमुख्यमंत्री पदापासूनही दूर गेले आहेत.

मुंबई - प्रदीर्घ काळ लांबलेल्या सत्तापेचानंतर राज्यात भाजपला बाजूला ठेवत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले. मात्र सत्तास्थापनेपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ चांगलीच गाजली. मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याच्या नाराजीतून अजित पवार यांनी भाजपसोबत जाणे पसंत केल्याच्या चर्चा त्यावेळी राजकारणात रंगल्या होत्या. आता शरद पवार यांनीच राष्ट्रवादीने आघाडीच्या काळात मुख्यमंत्रीपद का नाकारले, यावर आपली भूमिका स्पष्ट केली. 

युती सरकार 2014 मध्ये येण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. 15 वर्षे आघाडीने राज्याचा कारभार पाहिला. या कालावधीत राष्ट्रवादीला विधानसभेला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. तसेच ज्या पक्षाच्या जागा अधिक त्याला मुख्यमंत्रीपद असंही ठरलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित होते. तसेच अजित पवार यांचे नावही चर्चेत आले होते. मात्र पवारांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद न घेता मंत्रीपदं वाढवून घेतली होती. राज्यात पक्षविस्तार करण्याचा आपला उद्देश होता. त्यामुळे मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिल्याचे पवारांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीने राज्यात मोठे संघटन निर्माण केले होते. 

दरम्यान महाविकास आघाडीत सामील होताना राष्ट्रवादीला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळणे सहज शक्य होते. किंबहुना शिवसेनेने तयारीही दाखवली होती. परंतु, यावेळी देखील शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार देत उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास सांगितले. त्यामुळे आताही पवार यांचा भर पक्षविस्तारावर आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दुसरीकडे अजित पवार यांना दोनवेळा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. किंबहुना त्यामुळेच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र भाजपसोबत जाण्याच्या एकतर्फी निर्णयामुळे अजित पवार आता उपमुख्यमंत्री पदापासूनही दूर गेले आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह सर्वाधिक 16, शिवसेनेला 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रीपद मिळणार आहे.