शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

ठाकरेंच्या शिवसेनेला कुणापासून धोका? शिंदेंच्या शिलेदारानं थेट नावच घेतलं! केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:29 IST

"एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली. नाहीतर, त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महाविजयानंतर गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शपथविधी कार्यक्रमात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची, तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासंदर्भात बोलताना "एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली. नाहीतर, त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. यावर, आता शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी पलटवार करत, "शिंदे यांच्या नेतृत्वात 40 चे 62 आमदार झाले. तसेच, संजय राऊतांपासूनउद्धव ठाकरे गटाला मोठा धोका आहे," असे देसाई यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, काल भाजपचे एकनाथ शिंदे यांना वगळून शपथ घेण्याचे नियोजन होते, कसे बघता? असा प्रश्न विचारला असता शंभूराज देसाई म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांनी एक भूमिका घेतली, ती संख्या ४० वरून ६२ वर गेली. संजय राऊत काय बोलले, त्यातले खरे ठरले? यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने बघू नका. उलट, संजय राऊतांपासून उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धोका आहे." देसाई टीव्ही९ सोबत बोलत होते.

उद्धव ठाकरे गटामध्ये आमचे अनेक मित्र... -देसाई पुढे म्हणाले, "मी मागाशीही बोललो की, उद्धव ठाकरे गटामध्ये आमचे अनेक मित्र आहेत. जरी आमचे राजकीय विचार वेगळे असले, सभागृहामध्ये किंवा सभागृहाबाहेर आम्ही वेगवेगळ्या राजकीय भूमिका जरी मांडत असलो, तरी मित्र म्हणून आमचे बोलणे होते. मित्र म्हणून आम्ही एकत्र बसतो. तेव्हा अनेक तिकडचे उद्धव ठाकरे गटातलेसुद्धा लोक खाजगीत सांगतात की, यांच्या (संजय राऊत) बोलण्यामुळे, यांच्या वागण्यामुळे दुर्दैवाने उद्धव ठाकरे गटावर ही वेळ आलेली आहे." एवढेच नाही, तर "यामुळे, हा सावधानतेचा इशारा आहे, सावधगिरीचा एक इशारा आहे राऊतांना की, त्यांनी आता स्वतःला थोडासा आवर घालावा. नाहीतर राहिल्या साहिल्या उद्धव ठाकरे गटाची काय अवस्था होईल, हे कोणीच सांगू शकणार नाही," असेही देसाई म्हणाले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे