शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ठाकरेंच्या शिवसेनेला कुणापासून धोका? शिंदेंच्या शिलेदारानं थेट नावच घेतलं! केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:29 IST

"एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली. नाहीतर, त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महाविजयानंतर गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शपथविधी कार्यक्रमात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची, तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासंदर्भात बोलताना "एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली. नाहीतर, त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती," असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते. यावर, आता शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी पलटवार करत, "शिंदे यांच्या नेतृत्वात 40 चे 62 आमदार झाले. तसेच, संजय राऊतांपासूनउद्धव ठाकरे गटाला मोठा धोका आहे," असे देसाई यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, काल भाजपचे एकनाथ शिंदे यांना वगळून शपथ घेण्याचे नियोजन होते, कसे बघता? असा प्रश्न विचारला असता शंभूराज देसाई म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांनी एक भूमिका घेतली, ती संख्या ४० वरून ६२ वर गेली. संजय राऊत काय बोलले, त्यातले खरे ठरले? यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने बघू नका. उलट, संजय राऊतांपासून उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धोका आहे." देसाई टीव्ही९ सोबत बोलत होते.

उद्धव ठाकरे गटामध्ये आमचे अनेक मित्र... -देसाई पुढे म्हणाले, "मी मागाशीही बोललो की, उद्धव ठाकरे गटामध्ये आमचे अनेक मित्र आहेत. जरी आमचे राजकीय विचार वेगळे असले, सभागृहामध्ये किंवा सभागृहाबाहेर आम्ही वेगवेगळ्या राजकीय भूमिका जरी मांडत असलो, तरी मित्र म्हणून आमचे बोलणे होते. मित्र म्हणून आम्ही एकत्र बसतो. तेव्हा अनेक तिकडचे उद्धव ठाकरे गटातलेसुद्धा लोक खाजगीत सांगतात की, यांच्या (संजय राऊत) बोलण्यामुळे, यांच्या वागण्यामुळे दुर्दैवाने उद्धव ठाकरे गटावर ही वेळ आलेली आहे." एवढेच नाही, तर "यामुळे, हा सावधानतेचा इशारा आहे, सावधगिरीचा एक इशारा आहे राऊतांना की, त्यांनी आता स्वतःला थोडासा आवर घालावा. नाहीतर राहिल्या साहिल्या उद्धव ठाकरे गटाची काय अवस्था होईल, हे कोणीच सांगू शकणार नाही," असेही देसाई म्हणाले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे