शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

आरोप करणा-यांना बांधील नाही, राजकारण करण्याचा नीचपणा करणार नाही - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 17:34 IST

नालेसफाईत महापालिकेकडून कुठलाही गलथानपणा झालेला नाही. मुंबईत योग्य पद्धतीने नालेसफाई झाली आहे.

मुंबई, दि. 30 - नालेसफाईत महापालिकेकडून कुठलाही गलथानपणा झालेला नाही. मुंबईत योग्य पद्धतीने नालेसफाई झाली आहे. कोटयावधी रुपये योग्य पद्धतीने खर्च झाले नसते तर, मुंबईतून पाण्याचा निचरा झाला नसता असे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. मी ख-या मुंबईकरांना बांधील आहे. आरोप करणा-यांना मी बांधील नाही, कालच्या घटनेचे राजकारण करण्याचा नीचपणा करणार नाही असे उद्धव म्हणाले.  आरोप करणा-यांनी मुंबईत काल काय केले याची शहानिशा करा. शिवसेनेचे आमदार, महापौरांनी रस्त्यावर उतरुन काम केले असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. मंगळवारी मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर काहीवेळात मुंबापुरीची तुंबापुरी झाली. लोकांचे अक्षरक्ष हाल झाले. नेहमी धावणा-या मुंबईला ब्रेक लागला. या सर्व परिस्थितीसाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला जबाबदार धरण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. 

मुंबईत 29 ऑगस्टला झालेल्या पावसाची 26 जुलैच्या पावसाबरोबर तुलना करत असाल तर, निश्चितच मुंबईत 26 जुलैसारखी परिस्थिती नव्हती. महापालिकेने चांगल्या पद्धतीने काम केले असे उद्धव यांनी सांगितले. मुसळधार पावसाचा अंदाज असला तरी, अतिवृष्टी होईल असे वाटले नव्हते. मुंबईत पंपिंग स्टेशन्समधून सहा ते आठ हजार दशलक्ष लीटर पाणी बाहेर काढलं असे उद्धव म्हणाले. पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाताना एका क्षणाला उद्धव यांनी जनतेची सेवा करतो म्हणून जनतेने वारंवार आशिर्वाद दिला आहे असे सांगितले. मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्याने मिठी नदीत पूर आला नाही असे महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सांगितले. निर्सगाशी एका मर्यादेपर्यंत लढू शकतो असे उद्धव म्हणाले. 

काल मुंबईत भरपूर पाऊस झालाय हे आजच्या मुंबईकडे पाहून वाटत नाही. महापालिका, बीईएसटी कर्मचारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरुन जनतेची मदत करत होते असे उद्धव यांनी सांगितले. पावसानंतर आता रस्त्यांवर कचरा असून, रोगराई निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक निर्णय घेण्यात आले आहेत. शिवसेना मुंबईकरांसाठी उद्यापासून आरोग्य शिबिर सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मंगळवारी मुंबईच्या आकाशात 9 किलोमीटर उंचीचा ढग होता, सुदैवाने ढग फुटी झाली नाही अन्यथा काय परिस्थिती उदभवली असती याची कल्पनाही करता येत नाही असे उद्धव म्हणाले. मंगळवारी संपूर्ण मुंबईत 325 मिमी पाऊस झाला, 26 ठिकाणी एका तासात 50 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. 3 ते 5 या वेळेत 60 टक्के पाऊस झाला अशी माहिती महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली. 

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका