शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आरोप करणा-यांना बांधील नाही, राजकारण करण्याचा नीचपणा करणार नाही - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 17:34 IST

नालेसफाईत महापालिकेकडून कुठलाही गलथानपणा झालेला नाही. मुंबईत योग्य पद्धतीने नालेसफाई झाली आहे.

मुंबई, दि. 30 - नालेसफाईत महापालिकेकडून कुठलाही गलथानपणा झालेला नाही. मुंबईत योग्य पद्धतीने नालेसफाई झाली आहे. कोटयावधी रुपये योग्य पद्धतीने खर्च झाले नसते तर, मुंबईतून पाण्याचा निचरा झाला नसता असे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. मी ख-या मुंबईकरांना बांधील आहे. आरोप करणा-यांना मी बांधील नाही, कालच्या घटनेचे राजकारण करण्याचा नीचपणा करणार नाही असे उद्धव म्हणाले.  आरोप करणा-यांनी मुंबईत काल काय केले याची शहानिशा करा. शिवसेनेचे आमदार, महापौरांनी रस्त्यावर उतरुन काम केले असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. मंगळवारी मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर काहीवेळात मुंबापुरीची तुंबापुरी झाली. लोकांचे अक्षरक्ष हाल झाले. नेहमी धावणा-या मुंबईला ब्रेक लागला. या सर्व परिस्थितीसाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला जबाबदार धरण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. 

मुंबईत 29 ऑगस्टला झालेल्या पावसाची 26 जुलैच्या पावसाबरोबर तुलना करत असाल तर, निश्चितच मुंबईत 26 जुलैसारखी परिस्थिती नव्हती. महापालिकेने चांगल्या पद्धतीने काम केले असे उद्धव यांनी सांगितले. मुसळधार पावसाचा अंदाज असला तरी, अतिवृष्टी होईल असे वाटले नव्हते. मुंबईत पंपिंग स्टेशन्समधून सहा ते आठ हजार दशलक्ष लीटर पाणी बाहेर काढलं असे उद्धव म्हणाले. पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाताना एका क्षणाला उद्धव यांनी जनतेची सेवा करतो म्हणून जनतेने वारंवार आशिर्वाद दिला आहे असे सांगितले. मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्याने मिठी नदीत पूर आला नाही असे महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सांगितले. निर्सगाशी एका मर्यादेपर्यंत लढू शकतो असे उद्धव म्हणाले. 

काल मुंबईत भरपूर पाऊस झालाय हे आजच्या मुंबईकडे पाहून वाटत नाही. महापालिका, बीईएसटी कर्मचारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरुन जनतेची मदत करत होते असे उद्धव यांनी सांगितले. पावसानंतर आता रस्त्यांवर कचरा असून, रोगराई निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक निर्णय घेण्यात आले आहेत. शिवसेना मुंबईकरांसाठी उद्यापासून आरोग्य शिबिर सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मंगळवारी मुंबईच्या आकाशात 9 किलोमीटर उंचीचा ढग होता, सुदैवाने ढग फुटी झाली नाही अन्यथा काय परिस्थिती उदभवली असती याची कल्पनाही करता येत नाही असे उद्धव म्हणाले. मंगळवारी संपूर्ण मुंबईत 325 मिमी पाऊस झाला, 26 ठिकाणी एका तासात 50 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. 3 ते 5 या वेळेत 60 टक्के पाऊस झाला अशी माहिती महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली. 

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका