शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

Maharashtra Politics: “एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण देवेंद्र फडणवीस अन् टीम भाजपकडे गहाण ठेवलाय”; सुषमा अंधारेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 15:28 IST

Maharashtra News: निवडणूक आयोगाचा निकाल निश्चितपणे महाराष्ट्राला कुणाला पटलेला नाही, असे सांगत सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली.

Maharashtra Politics: जसे मला समजून घेतले तसे तुम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना समजून घ्या, असा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटचा शब्द एकनाथ शिंदे गट पाळू शकत नाहीत, यावरून हे सत्तातूर झालेत हे दिसून येते. एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण देवेंद्र फडणवीस अन् टीम भाजपकडे गहाण ठेवला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर मीडियाशी बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. 

निवडणूक आयोगाचा निकाल निश्चितपणे महाराष्ट्राला कुणाला पटलेला नाही. तथ्यांच्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय घेणे अपेक्षित होते. तथ्यांच्या आधारावर जेव्हा कागदपत्र सादर करायला सांगितली होती तेव्हा जर शिंदे गटाची एकूण कागदपत्र ४ लाख सादर झाली असतील. तर त्याच वेळेला आम्ही २२ लाख कागदपत्रे सादर केली होती, असे सांगत मूळात एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या साथीदारांनी मेरिट कधी सिद्ध केले, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली. 

एकनाथ शिंदे यांनी ठरवले पाहिजे की, आपण असे वागावे का?

भाजपने निवडणूक आयोगावर कब्जा केला आहे. जर अशा पद्धतीने भाजप निर्णय घेत असेल आणि हा निर्णय घेताना एकनाथ शिंदेचा कळसूत्री बाहुलीसारखी वापर होत असेल तर हे एकनाथ शिंदे यांनी ठरवले पाहिजे की, आपण असे वागावे का? एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस यांना विचारता एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. अजून त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा साधा करता आलेला नाही. शिवसेना आणि धनुष्यबाणाची गौरव गरिमा आणि अस्मिता शाबूत ठेवण्यासाठी काम करत असतील तर राज्यपाल कोश्यारींच्या राजीनामाच्या ऐवजी त्यांची हकालपट्टी करण्यासाठी त्यांनी केंद्राकडे मागणी केली असती, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. 

शिंदेंनी धनुष्यबाण देवेंद्र फडणवीस अन् टीम भाजपकडे गहाण ठेवला

कर्नाटकला गाव जोडतानाचा जेव्हा निर्णय चालू होता तेव्हा सुद्धा जोपर्यंत केंद्र सरकारचा सिग्नल मिळत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे चकार शब्द बोलले नाही. उलट बोम्मईच्या आक्रमकपणाला नंतरच्या काळात देवेंद्र काहीसे सामोरे आले परंतु एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवली नाही याचाच अर्थ एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण हा देवेंद्र फडणवीस आणि टीम भाजपकडे गहाण ठेवलेला आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. 

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आगामी कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत ठाकरे गटाला आताचे नाव आणि चिन्ह वापरता येणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा