शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एरव्ही खासदारांसह अंबाबाईच्या दर्शनाला जाणारे ठाकरे पूरग्रस्तांकडे फिरकलेच नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 16:48 IST

वास्तविक पाहता, निवडणूक विजयानंतर उद्धव ठाकरे आपल्या सर्व विजयी उमेदवारांना घेऊन कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला न चुकता जातात. परंतु, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला उद्धव ठाकरे यांनी भेट न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बई - भाजपची महाजनादेश, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य आणि शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आल्या आहेत. सांगली आणि कोल्हापुरात महापुराने थैमान घातले. हजारो लोक पुरात अडकले. या लोकांना वेळीच मदत मिळाली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या टीकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेतेही सुटले नाहीत. तर सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका पार पाडणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना सांगली किंवा कोल्हापूरला भेट देण्यासाठी अद्याप मुहूर्त मिळाला नाही.

मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगली आणि कोल्हापूरमधील मुहापुराची हवाई पाहणी केली. तर विविध संघटना, संस्था आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून सांगलीत मदत कार्य सुरू आहे. परंतु, याच कालावधीत गिरीश महाजन यांचा मदत कार्याला जातानाचा सेल्फी व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात विविध यात्रा काढण्यात आल्या. परंतु, सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरस्थितीमुळे या यात्रांवर सातत्याने टीका झाली. त्यामुळे पक्षांना या यात्रा रद्द कराव्या लागल्या. अनेक नेते पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावले. परंतु, ठाकरे पिता-पुत्र अद्याप मातोश्री सोडून पुरात अडकलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्याकडे फिरकले नाहीत. पुरस्थितीची पाहणी करण्यास उद्धव ठाकरे जाणार असल्याचे सांगण्यात येते, परंतु, तारिख निश्चित झालेली नाही.

वास्तविक पाहता, निवडणूक विजयानंतर उद्धव ठाकरे आपल्या सर्व विजयी उमेदवारांना घेऊन कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला न चुकता जातात. परंतु, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला उद्धव ठाकरे यांनी भेट न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली असली उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पुरस्थितीची पाहणी करण्याऐवजी मातोश्रीवरच थांबणे पसंत केले.