शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

एरव्ही खासदारांसह अंबाबाईच्या दर्शनाला जाणारे ठाकरे पूरग्रस्तांकडे फिरकलेच नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 16:48 IST

वास्तविक पाहता, निवडणूक विजयानंतर उद्धव ठाकरे आपल्या सर्व विजयी उमेदवारांना घेऊन कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला न चुकता जातात. परंतु, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला उद्धव ठाकरे यांनी भेट न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बई - भाजपची महाजनादेश, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य आणि शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आल्या आहेत. सांगली आणि कोल्हापुरात महापुराने थैमान घातले. हजारो लोक पुरात अडकले. या लोकांना वेळीच मदत मिळाली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या टीकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेतेही सुटले नाहीत. तर सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका पार पाडणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना सांगली किंवा कोल्हापूरला भेट देण्यासाठी अद्याप मुहूर्त मिळाला नाही.

मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगली आणि कोल्हापूरमधील मुहापुराची हवाई पाहणी केली. तर विविध संघटना, संस्था आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून सांगलीत मदत कार्य सुरू आहे. परंतु, याच कालावधीत गिरीश महाजन यांचा मदत कार्याला जातानाचा सेल्फी व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात विविध यात्रा काढण्यात आल्या. परंतु, सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरस्थितीमुळे या यात्रांवर सातत्याने टीका झाली. त्यामुळे पक्षांना या यात्रा रद्द कराव्या लागल्या. अनेक नेते पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावले. परंतु, ठाकरे पिता-पुत्र अद्याप मातोश्री सोडून पुरात अडकलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्याकडे फिरकले नाहीत. पुरस्थितीची पाहणी करण्यास उद्धव ठाकरे जाणार असल्याचे सांगण्यात येते, परंतु, तारिख निश्चित झालेली नाही.

वास्तविक पाहता, निवडणूक विजयानंतर उद्धव ठाकरे आपल्या सर्व विजयी उमेदवारांना घेऊन कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला न चुकता जातात. परंतु, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला उद्धव ठाकरे यांनी भेट न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली असली उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पुरस्थितीची पाहणी करण्याऐवजी मातोश्रीवरच थांबणे पसंत केले.