शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

दहावी-बारावीच्या परीक्षांना केवळ तीन महिन्यांचा अवधी; वेळेअभावी अभ्यासक्रम अपूर्ण, ५० टक्के अभ्यासक्रम कपातीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 8:46 AM

राज्यातील इतर जिल्ह्यांत किमान नववी ते बारावीचे वर्ग तरी सुरू झाले आहेत, मात्र मुंबईत विद्यार्थ्यांना अद्यापही ऑनलाइन शिक्षणाचाच आधार आहे. त्यात परीक्षा अवघ्या तीन महिन्यांवर आल्या असल्याने या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.

मुंबई : कोरोनामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असून, एप्रिल, मे महिन्यांत परीक्षा होण्याचे संकेत आहेत. मात्र अद्यापही मुंबई महापालिका क्षेत्रात शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झालेली नसल्याने विद्यार्थी पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत किमान नववी ते बारावीचे वर्ग तरी सुरू झाले आहेत, मात्र मुंबईत विद्यार्थ्यांना अद्यापही ऑनलाइन शिक्षणाचाच आधार आहे. त्यात परीक्षा अवघ्या तीन महिन्यांवर आल्या असल्याने या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: १० महिन्यांचा कालावधी दिला जात होता. यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. मात्र मुंबईत जानेवारी सुरू झाला तरी नियमित वर्ग सुरू झाले नाहीत. तसेच कमी कालावधीमध्ये शिकवलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समजण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आणखी २५ टक्के कपात करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. 

दहावीचा अभ्यासक्रमयंदा कोरोनामुळे दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्याने कमी केला असला तरी गणित, विज्ञान हे विषय ऑनलाइन पद्धतीने समजून घेणे कठीणच आहे. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत शिक्षकांसह विद्यार्थ्यांना करावी लागते.

बारावीचा अभ्यासक्रमबारावीच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती मोठी आहे, शिवाय प्रात्यक्षिकांचा सराव यंदा झाला नसल्याने काही शंकांचे निरसन झाले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. अशात परीक्षा दिल्या तर पुढील करिअर निवडण्यात चांगली दमछाक होईल, अशी काळजी पालकांना सतावत आहे.

परीक्षेचा अर्ज भरला आहे, मात्र परीक्षेला काय विचारतील, पेपर पॅटर्न कसा असेल, यामुळे अभ्यासक्रम पूर्णच झाला नाही असे वाटते. यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे परीक्षेत नक्की काय होणार याची चिंता आहे.- भाग्यश्री नलावडे, दहावी, विद्यार्थिनी

यंदा सगळे अभ्यासक्रम ऑनलाइन घेत आहेत, त्यामुळे अनेक विषय जे प्रत्यक्षात समजावून घेतले जातात त्यांचा अभ्यास झालाच नाही असे वाटत आहे. प्रात्यक्षिकांचे गुण याविषयीही संभ्रम आहेच.- अद्वैत ठाकूर, बारावी, विद्यार्थी

दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थी, पालक दोघेही मानसिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या तयार नाहीत. अभ्यासक्रम पूर्ण शिकवून न झाल्याने नापास होण्याची चिंता अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. परिणामी विद्यार्थी मानसिक तणावाखाली येण्याची शक्यता लक्षात घेऊन अभ्यासक्रम आणखी २५ टक्के कमी करून ५० टक्के करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.- प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

अभ्यासक्रमात २५ टक्के कपात शिक्षण विभागाने यापूर्वी केली आहे. मात्र मुंबईत अद्याप शाळा सुरू न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या कायम आहेत. आधीच्या समस्या सोडवून अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा हे आमच्यासाठी मोठे आव्हान आहे. शिक्षण विभागाने कार्यपध्दती जाहीत केल्यास मार्गदशर्न मिळू शकेल.- आनंद राजवाडे, प्राचार्य

तीन महिन्यांमध्ये ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे व त्याची उजळणी घेणे शक्य नाही. तसेच कमी वेळात शिकवलेल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना नीट आकलन होणे अशक्य आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होऊन ते परीक्षेत नापास होण्याची शक्यता अधिक आहे, असे शिक्षकांकडून सांगण्यात आले.   

टॅग्स :Schoolशाळाexamपरीक्षाStudentविद्यार्थी