शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

जपून जा रे... पुढे धोका आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 07:17 IST

पावसाळ्यात लोणावळा, माळशेज घाट, आंबोली घाट अशा ठिकाणी गर्दीचा प्रचंड रेटा असतो. आतापर्यंत सह्याद्रीत, पर्यटन स्थळांवर, ओढे, तलाव, धरणे इत्यादी ठिकाणी अनेक दुर्घटना झाल्याची नोंद आहे. धबधब्याखाली खळग्यात बुडालेल्यांची संख्या मोठी आहे.

राहुल मेश्राममुख्य समन्वयक, महाराष्ट्र माउंटेनिअर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर

पावसाच्या सरी कोसळायला लागल्या की शहरातल्या गर्दीतून सुटका करुन घेण्यासाठी सर्वजण निसर्गरम्य ठिकाणी धाव घेतात. गिरीपर्यटक, पर्यटक, हौशे-नवशे अशा सर्वांची एकच झुंबड उडते. राजमाची, सिंहगड, लोहगड, कळसुबाई अशा अनेक ठिकाणी तर पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने ट्रेकर्सबरोबर पर्यटक देखील येतात. मात्र, समाजमाध्यमांवर फोटो टाकण्यासाठी किंवा रील बनविण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, योग्य काळजी घेतल्यास चुका टाळता येतील आणि वर्षा पर्यटनाचा आनंद घेता येईल. 

‘ही’ स्टंटबाजी जीवावर बेतेल

डोंगरावरील अवघड वाटेने पावसाळ्यात चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या भटक्यांना अपघाताला सामोरे जावे लागणे, डोंगर भटकंती करताना वाट चुकून वेगळ्याच डोंगरावर पोहोचल्याच्या किंवा रात्रभर उघड्यावर बसायला लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 

ट्रेकर्स, गिरीपर्यटक, पिकनिकर्स यांनी जशी खबरदारी घ्यायला हवी तशीच काही पावले शासनाकडून उचलण्याची गरज आहे. आपल्याकडे एकूणच अपघात घडल्यानंतर होणाऱ्या चौकशीवर अधिक भर असतो आणि अपघातानंतर तातडीने पर्यटन स्थळावर बंदी घालण्याकडे कल असतो. 

त्याऐवजी शासनाने यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली तर नियमांच्या चौकटीत राहून नियंत्रित पद्धतीने पर्यटकांना पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येणे शक्य होऊ शकते.

कोणत्याही पर्यटन स्थळाची एक मर्यादित वहन क्षमता (कॅरिंग कपॅसिटी : किती पर्यटकांना सामावून घेता येईल, याचे गणित) असते. त्याआधारे पर्यटक संख्येवर मर्यादा घालावी.

अपघात टाळण्यासाठी शासनाने ‘हे’ करावे

कास पठार, वन्यजीव तसेच व्याघ्र अभयारण्य येथे नोंदणी प्रक्रिया व इतर यंत्रणा दिसतात. समान तत्त्वावर गर्दी होणाऱ्या पर्यटन स्थळांसाठी मर्यादित जागांसाठी पर्यटकांना शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करावे. 

संबंधित पर्यटन स्थळावर याच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस, वनविभाग, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून यंत्रणा तयार करावी. प्रथमोपचार व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. 

अपघाताच्या शक्यता गृहीत धरून गिर्यारोहण संस्थांच्या माध्यमातून बचाव पथकाचे मार्गदर्शन घ्यावे. धोक्याच्या संभाव्य जागांवर लक्ष ठेवावे व तेथे प्रतिबंध करावा. 

सर्व पर्यटन स्थळांवर दारू किंवा इतर कोणत्याही मादक पदार्थांच्या सेवन आणि विक्रीवर बंदी घालण्यात यावी.

काळजी घ्या

डोंगरमाथ्यावर पाऊस वाढल्यास सहज पार करू असे वाटणारे ओढे, धबधबे धोकादायक ठरू शकतात. 

धबधब्याचे पाणी जेथे पडते तेथे तयार झालेल्या खड्ड्यात उतरू नये. तेथे भोवऱ्यामुळे त्या पाण्यातून बाहेर येणे पट्टीच्या पोहणाऱ्यालाही अशक्य होते. 

शरीर डीहायड्रेड झाल्यामुळे दुष्परिणाम होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे.

हे लक्षात ठेवा

चमूतील सदस्यांची संख्या मर्यादित असावी. प्रथमोपचार साहित्य तसेच सोबत किमान एखादा प्रशिक्षित अनुभवी आणि प्रमाणित वैद्यकीय प्रथमोपचार करणारा हवा.

ट्रेक संदर्भातील सर्व माहिती (कुठे, किती दिवस, ग्रुप कोणता, लीडर तसेच इतरांचे संपर्क क्रमांक) घरी किंवा जवळच्या व्यक्तीस द्यावी.

पायथ्याच्या गावातील स्थानिक, जवळचे हॉस्पिटल आणि पोलिस चौकी यांचे संपर्क क्रमांक न चुकता जवळ बाळगून ठेवावेत. पायथ्याच्या गावातून गाईड सोबत घ्यावा.

किल्ल्यांवरील तट, दरवाजे, इतर पडीक अवशेष यावर चढू नये. एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होऊ शकतो.

काही दुर्घटना घडल्यास ७६२०२३०२३१ या २४x७ रेस्क्यू हेल्पलाइनवर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधावा. पावसाळी पर्यटन हे आनंदासाठी असते. त्यामुळे योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा आनंद द्विगुणित होईल. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMumbaiमुंबई