शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:33 IST

Swami Govind Dev Giri Maharaj: ज्यांना कधी संघ पटला नाही, हिंदुत्व पटले नाही, त्यांना नैतिकता कशाशी खातात, हे कळलेच नव्हते. या लोकांची आयात फार मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे संघ परिवार प्रदुषित होऊ शकतो, असे स्वामी गोविंददेव गिरी यांनी म्हटले आहे.

Swami Govind Dev Giri Maharaj: ज्यांना कधी संघ ही पटला नव्हता, ज्यांना कधी हिंदुत्वही पटले नव्हते, अशा लोकांची आयात केली गेली. यामुळे गंगा जशी नाल्यांनी प्रदूषित झाली, तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSSही प्रदूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावध राहिले पाहिजे, असे म्हणत रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी भारतीय जनता पक्षाचे अप्रत्यक्षपणे कान टोचले.

या शताब्दी वर्षामध्ये पूज्य डॉक्टरांपासून अनेक प्रचारकांची जी नावे समोर येतात, त्याने डोळे भरून येतात. या लोकांनी जे तप केले, जो त्याग केला, त्या तपाला आणि त्यागाला न्याय द्यायचा असेल, तर यापुढचा देश टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी संघाने सावध राहायला हवे, असे मला कधीकधी वाटते. याचे कारण संघाच्या व्यापक झालेल्या कार्यात वेगवेगळ्या मार्गाने जी आयात केलेली मंडळी येतात, त्यांचे संस्कार वेगळे आहेत. ज्यांना कधी संघ पटला नाही, हिंदुत्व पटले नाही, त्यांना नैतिकता कशाशी खातात, हे कळलेच नव्हते. या लोकांची आयात फार मोठ्या प्रमाणात झाली. गंगा तर शुद्ध आहे, पण गंगेतील नाल्यांनी ती प्रदुषित केली. त्यामुळे संघ परिवार प्रदुषित होण्याची शक्यता मला वाटते, असे स्वामी गोविंददेव गिरी यांनी म्हटले आहे. 

काही पथ्यांचे पालन केले तर निश्चितपणे आपला देश मृत्यूंजय करेल

काही पथ्यांचे पालन केले तर निश्चितपणे आपला देश मृत्यूंजय करेल, तो करणार आहे, याचा मला विश्वास आहे. मृत्युंजय देशासाठी संघ आणि हिंदुत्व आवश्यक असून संघ परिवाराने सावध राहण्याची आवश्यकता आहे. प्राचीन ते मध्ययुगीन काळात भारतावर वेगवेगळ्या शक्तींची, परकीयांची मोठी आक्रमणे झाली, अनेक संकटे आली, मंदिरे पाडली, विद्यापीठे उध्वस्त केली, हिंदूत्वावर आघात केला. परंतु, संघाने योजनाबद्ध पद्धतीने प्रतिकार केला. देशाची संस्कृती, आंतरिक सजीवता कायम ठेवली आहे. त्यामुळे भारत देशाला कोणीही संपवू शकले नाहीत. इतकेच नव्हे, तर संघाला संपविण्याचा तीनवेळा प्रयत्नही केला. हीच विरासत सांभाळून देशाला पुढे न्यायचे आहे, असेही ते म्हणाले.

हिंदूंची संख्या कमी झाली तर काय करणार?

जगाच्या इतिहासात काही धर्मांध शक्तींनी अनेक धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली. परंतु, जगाच्या पाठीवर भारतच असा एकमेव देश आहे, ज्याने हिंदूत्वाची आस्था, प्रेरणा असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर पुन्हा त्याच ठिकाणी उभारले आहे. यापूर्वी देशाच्या सीमांचा संकोच झाला; पण यापुढे संकोच नको. पण हिंदूंची संख्या कमी झाली तर काय करणार? समाजाला लागलेली कीड शोधताना हिंदूंची संख्या कमी होणार नाही हे भान ठेवावे लागणार आहे. जग सुखी हवे असेल तर समर्थ भारतासाठी हिंदू पाहिजे, असे स्वामी गोविंददेव गिरी यांनी नमूद केले. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा