शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

जिल्हाधिकाऱ्यांविरोधात स्वाभिमानी जाणार न्यायालयात : राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 11:42 IST

राज्यातील १९५ पैकी अवघ्या ४३ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली असून, उर्वरीत कारखान्यांकडे ३ हजार ५९५ कोटी रुपये थकीत आहेत.

ठळक मुद्देएफआरपी बाबत कर्तव्यात कसूर केल्याने आंदोलनही करणारराज्यात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन बिहार आणि उत्तरप्रदेशातील काही मतदारसंघात १० मे नंतर प्रचाराला जाणार राज्यातील ३० कारखान्यांनी एकूण एफआरपीच्या ६० टक्के देखील रक्कम दिलेली नाही

पुणे : उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या कारखान्यांविरोधात मालमत्ता जप्तीची नोटीस बजावूनही कारवाई न करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी न्यायालयात जाणार आहे. तसेच,अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली. राज्यातील १९५ पैकी अवघ्या ४३ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली असून, उर्वरीत कारखान्यांकडे ३ हजार ५९५ कोटी रुपये थकीत आहेत. राज्यात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. पुण्यातील विघ्नहर कारखान्याचे सोमवारी गाळप संपले असून, यंदाचा हंगामही संपुष्टात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी शिष्टमंडळासह थकीत एफआरपी बाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सोमवारीभेट घेतली. त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचे ऊस बिल थकविणाऱ्या राज्यातील जवळपास ६२ साखर कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केली आहे. थकबाकी वसुलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीपिकेट (आरआरसी) बजावूनही जिल्हाधिकारी कारखान्यांवार कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अशा जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात येईल. तसेच, संघटनेच्या वतीने या जिल्हाधिकाºयांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनही सुरु करण्यात येईल.  याबाबत माहिती देताना साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, थकबाकीदार कारखान्यांवर आरआरसी करण्याची कारवाई सुरु असून, सोमवारी दिवसभरात आणखी सहा कारखान्यांवर कारवाई करण्यात आली. काही कारखान्यांवर तर, दोनदा आरआरआरसीची कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील ३० कारखान्यांनी एकूण एफआरपीच्या ६० टक्के देखील रक्कम दिलेली नाही. -----------------------------------

साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केल्यानंतर महसुली वसुली करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. जिल्हाधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. थकबाकीदार कारखान्यांमध्ये बहुतांश कारखाने भाजपशी संबंधित नेत्यांचे आहेत. अगदी मित्र पक्षांच्या थकबाकीदार कारखान्यांवर देखील कारवाई झाली पाहीजे, अशीच आमची भूमिका आहे. त्यासाठी न्यायालय आणि आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला जाईल. खासदार राजू शेट्टी, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना 

-----------------------

वाराणसीत प्रचाराला जायला आवडेल : शेट्टी

बिहार आणि उत्तरप्रदेशातील काही मतदारसंघात १० मे नंतर प्रचाराला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात देखील प्रचाराला जायला आवडेल. मात्र, अजून तेथून निमंत्रण आलेले नाही. तसेच, जेथे गरज असेल तेथे प्रचाराला जाण्याची तयारी असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखानेcollectorजिल्हाधिकारी