शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविलेले संशयास्पद पत्र पुण्यातील खडकीतून..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 8:59 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटोंचाही समावेश..

ठळक मुद्देपुणे पोलिसांकडे कोणत्याही यंत्रणेने अद्यापपर्यंत संपर्क साधला नाही.... साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविण्यात आलेले हे पत्र उर्दु भाषेत...

पुणे : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या भोपाळ येथील घश्री पोस्टाद्वारे मिळालेले संशयास्पद पत्र हे पुण्यातून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रावर शिवाजी चौक, खडकी बाजार, खडकी, ता़. जिल्हा पुणे, महाराष्ट्र, इंडिया असा पत्ता दिला आहे. स्वामी रामचंद्र अय्यर ईश्वरचंद असे पत्र पाठविणाऱ्यांचा उल्लेख पत्रावर करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पुणे पोलिसांकडे कोणत्याही यंत्रणेने अद्यापपर्यंत संपर्क साधला नाही. तसेच चौकशीबाबत तक्रार आलेली नाही, अशी तक्रार मिळाल्यास त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल, असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविण्यात आलेले हे पत्र उर्दु भाषेत लिहिलेले आहे. या पत्रासोबत दोन पुड्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आहे. या पावडरला हात लावल्यामुळे खाज सुटत असल्याचे तपासात समोर आले आहे. या पाकिटातून पाठविलेल्या पत्राबरोबर आणखी काही पाने असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटोंचाही समावेश आहे. त्यावर लाल पेनाने संशयास्पद खुणा करण्यात आलेल्या आहेत. तसेच फोटोसमोर या सर्वांवर बंदुक रोखल्याचे दिसून येते. घटनेची माहिती मिळताच भोपाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्र व त्यासोबत आलेली पावडर ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांकडे अशा पत्राबाबत कोणत्याही यंत्रणेने अद्याप पर्यंत संपर्क साधला नाही. तसेच चौकशीसाठीही तक्रार आलेली नाही. अशी तक्रार मिळाल्यास त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल,असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले.-------------------------------------------------हे एका पाकिटातून पाठविलेले साधे पत्र आहे. त्यामुळे त्याची नोंद नसल्याचे या पत्राचा टपाल खात्यात त्याची नोंदणी नसते. त्यामुळे या पत्राचा माग काढणे अवघड असते. शहरातील टपाल पेट्या किंवा टपाल कार्यालयात जमा होणारी पत्रे गोळा केली जातात. त्या टपालांचे राज्य, गावांनुसार वेगळी केली जातात. त्यावर शिक्के मारुन नंतर ती आरएमएस विभागाकडे पाठविली जातात. आरएमएस विभागाकडून संबंधित गावांकडे ही पत्रे पाठविली जातात. साधे पत्रांची नोंद नसल्याने ते पत्र नेमके कोणी पाठविले याची नोंद नसते.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीSadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरPoliceपोलिस