शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

...तर सरकारला नव्याने शपथविधी घ्यावा लागेल; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काय घडेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 11:54 IST

सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र केले तर सरकारच्या बहुमताबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात.

मुंबई - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्ट काय निकाल देऊ शकते यावरून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा परिणाम थेट राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर राज्यात काय घडू शकते यावरून अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. १६ आमदारांना अपात्र ठरवले गेले तर राज्यात पुन्हा नव्याने सरकारचा शपथविधी घ्यावा लागू शकतो असं विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी म्हटलं. 

अनंत कळसे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र केले तर सरकारच्या बहुमताबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो. सरकारच्या नंबरगेममध्ये काही फरक पडेल वाटत नाही. कारण या सरकारला १७० हून अधिक आमदारांचा पाठिंबा होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या १६ आमदारांमध्ये आहेत. त्यामुळे शिंदेंना राजीनामा देऊन पुन्हा नव्याने शपथविधी पार पाडावा लागेल. नवीन मुख्यमंत्री प्रक्रिया पार पडेल असं त्यांनी सांगितले. 

"तत्कालीन अध्यक्ष म्हणून निर्णय माझ्याकडेच येणार"सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अपात्रतेच्या निर्णयाचा अधिकार मलाच मिळेल. सत्तांतराचा घटनाक्रम उलटा मागे फिरवला जाईल. त्यावेळी विधिमंडळाचे अध्यक्षपद रिक्त असल्याने उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे पदभार होता. मी तत्कालीन अध्यक्ष म्हणून तो निर्णय घेतला होता. आता जरी अध्यक्ष असले तरी त्यावेळी मी घेतलेल्या निर्णयामुळे कोर्टाकडून मलाच संधी दिली जाईल. मी आता उपाध्यक्ष नसतो तर कदाचित ही संधी मिळाली नसती, त्यामुळे हा निर्णय माझ्याकडेच येईल असा दावा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. 

निकालात काय शक्यता आहे?सुप्रीम कोर्टाच्या निकालात काय असू शकते यावर अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. त्यात पहिली शक्यता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना व्हिपचे उल्लंघन केल्याचे कोर्टाने मान्य केल्यास त्यांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवू शकतात. त्याचसोबत या आमदारांवर कारवाई करण्याची ठरावित मुदत दिली जाऊ शकते. आमदारांवर काय कारवाई करायची याचे अधिकार अध्यक्षांकडेच असतील. तर दुसरी शक्यता अशी की, मविआ सरकार ज्यारितीने पाडण्यात आले त्यावर सुप्रीम कोर्ट ताशेरे ओढू शकते आणि नबाम रेबिया प्रकरण या खटल्यात लागू होते की नाही हे ठरवण्यासाठी प्रकरण ७ सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला जाऊ शकतो असं बोलले जात आहे.   

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदे