शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...तर सरकारला नव्याने शपथविधी घ्यावा लागेल; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काय घडेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 11:54 IST

सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र केले तर सरकारच्या बहुमताबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात.

मुंबई - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्ट काय निकाल देऊ शकते यावरून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा परिणाम थेट राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर राज्यात काय घडू शकते यावरून अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. १६ आमदारांना अपात्र ठरवले गेले तर राज्यात पुन्हा नव्याने सरकारचा शपथविधी घ्यावा लागू शकतो असं विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी म्हटलं. 

अनंत कळसे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र केले तर सरकारच्या बहुमताबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो. सरकारच्या नंबरगेममध्ये काही फरक पडेल वाटत नाही. कारण या सरकारला १७० हून अधिक आमदारांचा पाठिंबा होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या १६ आमदारांमध्ये आहेत. त्यामुळे शिंदेंना राजीनामा देऊन पुन्हा नव्याने शपथविधी पार पाडावा लागेल. नवीन मुख्यमंत्री प्रक्रिया पार पडेल असं त्यांनी सांगितले. 

"तत्कालीन अध्यक्ष म्हणून निर्णय माझ्याकडेच येणार"सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अपात्रतेच्या निर्णयाचा अधिकार मलाच मिळेल. सत्तांतराचा घटनाक्रम उलटा मागे फिरवला जाईल. त्यावेळी विधिमंडळाचे अध्यक्षपद रिक्त असल्याने उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे पदभार होता. मी तत्कालीन अध्यक्ष म्हणून तो निर्णय घेतला होता. आता जरी अध्यक्ष असले तरी त्यावेळी मी घेतलेल्या निर्णयामुळे कोर्टाकडून मलाच संधी दिली जाईल. मी आता उपाध्यक्ष नसतो तर कदाचित ही संधी मिळाली नसती, त्यामुळे हा निर्णय माझ्याकडेच येईल असा दावा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. 

निकालात काय शक्यता आहे?सुप्रीम कोर्टाच्या निकालात काय असू शकते यावर अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. त्यात पहिली शक्यता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना व्हिपचे उल्लंघन केल्याचे कोर्टाने मान्य केल्यास त्यांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवू शकतात. त्याचसोबत या आमदारांवर कारवाई करण्याची ठरावित मुदत दिली जाऊ शकते. आमदारांवर काय कारवाई करायची याचे अधिकार अध्यक्षांकडेच असतील. तर दुसरी शक्यता अशी की, मविआ सरकार ज्यारितीने पाडण्यात आले त्यावर सुप्रीम कोर्ट ताशेरे ओढू शकते आणि नबाम रेबिया प्रकरण या खटल्यात लागू होते की नाही हे ठरवण्यासाठी प्रकरण ७ सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला जाऊ शकतो असं बोलले जात आहे.   

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदे