शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

वैद्यकीय महाविद्यालयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 18:51 IST

राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्रास डोनेशन घेऊन एनआरआय कोटयातील प्रवेश केले जात असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देप्रवेश प्रक्रियेवर आक्षेप : एनआरआय कोटयातील प्रवेशांमध्ये घोळ

पुणे : राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, अभिमत व खाजगी विद्यापीठांमध्ये एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे राखीव एन.आरआय कोटीतील प्रवेशप्रक्रिया राबविताना मोठयाप्रमाणात गैरप्रकार घडत आहे. सर्रास डोनेशन घेऊन एनआरआय कोटयातील प्रवेश केले जात असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालयांमधील एनआरआय कोटयातील प्रवेश कशी राबवायची याबाबत स्पष्ट निर्देश दिले असतानाही त्याचे वैद्यकीय महाविद्यालयांकडून सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळ खाजगी महाविद्यालय, अभिमत विद्यापीठ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाविरोधात सर्वोच्च न्यायालयात मनविसेचे शहर अध्यक्ष कल्पेश यादव यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण संचालक तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व अभिमत विद्यापीठांमध्ये एनआरआय कोटयातील प्रवेश प्रक्रिया राबविताना विद्यार्थी-पालक एनआरआय असेल तर त्या विद्यार्थ्यास प्रथम प्राधान्य द्यावे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्याचे नातेवाईक एनआरआय असतील आणि ते विद्यार्थ्याची संपूर्ण फी ही त्यांच्या एनआरआय बँक खात्यातून देणार असतील तरच त्या विद्यार्थ्यांना एनआरआय कोटयातून प्रवेश द्यावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण संचलनालयाकडून त्याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले होते. मात्र तरीही अनेक खाजगी महाविद्यालयांनी एनआरआय कोटयाची प्रवेश प्रक्रिया यानुसार पार पाडली नाही. अनेक खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लाखो रूपयांचे डोनेशन घेऊन एनआरआय कोटयातून प्रवेश देण्यात आले आहेत. जनहित याचिके व्दारे ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दशनास आणून देण्यात आली आहे.    वैद्यकीय शिक्षण संचालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना गुणवत्तेनुसारच प्रवेशप्रक्रिया राबवावी तसेच शैक्षणिक वर्ष २०१७-१८  मध्ये एनआरआय कोटयातंर्गत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्याची संपूर्ण तपशिलांसह  माहिती संकेतस्थळावर प्रदर्शित करावे, असे निर्देश दिले होते. मात्र, तरीही अनेक खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी याचे पालन केलेले नाही. उलट पुन्हा डोनेशन घेऊन एनआरआय कोटयातील प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. विशेष म्हणजे समुपदेशन करतेवेळी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाºयांसमक्षच असे प्रवेश झाले आहेत. याबाबत सर्व माहिती पुराव्यानिशी जनहित याचिके व्दारे सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आली आहे ,असे कल्पेश यादव यांनी सांगितले. 

................विद्यार्थ्यांना दिलासा मिळावावैद्यकिय महाविद्यालयांकडून एनआरआय कोटयातील प्रवेश प्रक्रिया योग्यप्रकारे राबविली जात नसल्याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडेवेळोवेळी दाद मागूनही उपयोग झाला नाही. महाविद्यालयांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे या याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना निश्चित दिलासा मिळेल अशी अपेक्षा असल्याचे कल्पेश यादव यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थी