शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शिर्डीतील साईबाबा मंदिर उघडा; भाजपाच्या खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 21:14 IST

केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकार त्यावर निर्णय का घेत नाही? असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देशिर्डीत कोरोना चाचणी संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्त शिर्डीत आलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

अहमदनगर : शिर्डीतील साईसमाधी मंदिर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहे, ते तातडीने खुले करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे. तसेच, केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकार त्यावर निर्णय का घेत नाही? असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

शिर्डीत कोरोना चाचणी संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्त शिर्डीत आलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिर्डीतील साईबाबा मंदिर खुले करण्याची मागणी केली आहे. यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. 

आंतराष्ट्रीय कीर्ती प्राप्त असलेले साईबाबा मंदिर साडेपाच महिन्यापासून बंद आहे. केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच अनुमती दिली आहे. मात्र राज्य सरकार निर्णय का घेत नाही? राज्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिरामध्ये विश्वस्त मंडळे आहेत. ऑनलाईन पासेसच्या माध्यमातून दर्शनाचे ते नियोजन करु शकतात. अशा मंदिरांना राज्यसरकारने परवानगी देण्याची गरज आहे, असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.

याचबरोबर, शिर्डीचे सर्व अर्थकारण येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. मंदिर बंद असल्याने सध्या सर्व व्यवहार ठप्प आहेत. केंद्र सरकारने विविध उपायोजना राबवून देशवासींयाना मदत केली आहेच. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या इतर गरजा देखील मोठ्या आहेत. त्यामुळे येथील अर्थकारण पुन्हा सुरळीत होण्यासाठी तातडीने निर्णय होण्याची गरज आहे. आवश्यक ते नियम व अटी पाळून मंदिर उघडण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरshirdiशिर्डीBJPभाजपाSujay Vikheसुजय विखे