शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक कर्जमाफीसाठी सुभाष देशमुखांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:11 IST

कर्जमाफीत पारदर्शकता आणायची असेल तर ऑनलाइन प्रक्रिया राबवा

ठळक मुद्देपारदर्शकता यायची असेल तर ऑनलाइन  व्यवस्था असलीच पाहिजे - सुभाष देशमुखबँका उद्या कसलेही कर्ज शेतीचे कर्ज म्हणून घालतील - सुभाष देशमुखराज्य सरकार त्याचा परतावा देईल - सुभाष देशमुख

सोलापूर : कर्जमाफीत पारदर्शकता आणायची असेल तर ऑनलाइन  प्रक्रिया राबवा. ऑनलाइन  प्रक्रिया राबविणे काही त्रासाचे नाही. पारदर्शकता नसेल तर शेतकºयांऐवजी दुसºयालाच त्याचा लाभ होईल, असे मत राज्याचे माजी सहकार वपणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. 

देशमुख, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांचा सात बारा कोरा करतो म्हणून आश्वासन दिले होते. उलट त्यांनी शेतकºयांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केले आहे. दोन लाखाची कर्जमाफी ही उसन्या टाईप आहे. मार्चनंतर खरच कर्जमाफी मिळेल का? याची शाश्वती नाही. मागच्यासरकारने कर्जमाफी करताना ऑनलाइन  माहिती मागविली होती. बँकेच्या स्टेट लेव्हल समितीने दिलेल्या माहितीत ८९ लाख शेतकरी होते. त्यासाठी ४२ हजार कोटी रुपयेलागतील, असे कळविले होते. प्रत्यक्षात बँकांकडून माहिती मागवली त्यावेळी कमीमाहिती आली. कारण बँकेने त्यात कसलीही कर्ज घातली होती.

पारदर्शकता यायची असेल तर ऑनलाइन  व्यवस्था असलीच पाहिजे. बँका उद्या कसलेही कर्ज शेतीचे कर्ज म्हणून घालतील. राज्य सरकार त्याचा परतावा देईल. हा राज्यातील जनतेच्या कष्टाच्या पैशाचा दुरुपयोग ठरेल. शेतकºयांला फायदा व्हायच्या ऐवजी दुसºया कुणाला तरी होईल. मागच्या सरकारनेकेलेल्या कर्जमाफीत मुंबईत शेती असणाºया शेतकºयाला कर्जमाफी मिळाली होती. मुंबईतशेती कुठं आहे हे अजून कळालेलं नाही. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया ऑनलाइन  केलीपाहिजे. बँकांना ऑनलाइन  माहिती देणं सोपं आहे.  

शेतकºयांचा मताधिकार काढून घेणेचुकीचे  आम्ही बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिला होता. पूर्वी सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्यासदस्यांना मतदानाचा अधिकार होता. बाजार समितीत निवडून येणाºया प्रतिनिधीचेमतदाराला उत्तरदायित्व असते. पुढच्या वेळेस त्याला मतदारांकडे जायचे असते.सोसायटी, ग्रामपंचायतीतून निवडून येणारे सदस्य पुढच्या वेळी निवडून येतील, असेनाही. शेतकºयांबद्दल त्यांची बांधिलकी राहत नाही. यामुळेच बाजार समित्यांची वाटलागली आहे. शेतकºयाला मतदानाचा अधिकार नाही म्हणजे त्यांना विचारायचा अधिकारनाही. मताधिकार काढून घेणे चुकीचे आहे, असे मतही सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेSubhash Deshmukhसुभाष देशमुखFarmerशेतकरीagricultureशेती