शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

कहाणी पाथरवट समाजाची....लुप्त होत चाललेल्या पाटा- वरवंट्याची ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 8:35 PM

 रस्त्याच्या कडेला आवाज करत छिन्नीने दगड फोडून वेगवेगळ्या मूर्ती आणि स्वयंपाक घरातील साधन बनवण्याची कला हातात असणाऱ्या या समाजातले कलाकार शेवटचे ठरणार आहेत.

पुणे : पाटा- वरवंट्यावर वाटलेल्या मसाल्याची भाजी मिळेल वाचल्यावर अनेकांची पावलं तिकडे वळतात. मोठं अंगण, सारवलेली जमीन, पाट्यावर वाटलेला मसाला, चुलीवरची भाकरी असं वर्णन थेट आपल्याला गावची आठवण करून देत. वाढत्या शहरीकरणात अंगण कमी झाले आणि फ्लॅट आले, चूल गेली, गॅस आला आणि पाटा-वरवंटा गेला, मिक्सर आला. अर्थातच यामागे ज्या समाजांचे त्यावर पोट भरत होते त्यांचे अर्थकारणही बिघडले आहे. त्यापैकीच एक म्हणजे पाथरवट समाज. 

         रस्त्याच्या कडेला आवाज करत छिन्नीने दगड फोडून वेगवेगळ्या मूर्ती आणि स्वयंपाक घरातील साधन बनवण्याची कला हातात असणाऱ्या या समाजातले कलाकार शेवटचे ठरणार आहेत. त्यांच्या पुढच्या पिढीने हे काम थांबवून केव्हाच दुसरे व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. तंत्रज्ञानाच्या हव्यासाने अजून एका कलेचा जीव गेल्याचं हे अगदी अलीकडंच उदाहरण आहे. पुणेच नाही तर संपूर्ण राज्यात ठिकठिकणी दगड फोडून मोठ्या प्रयत्नाने त्यापासून वस्तू घडवणारे कलाकार आहेत. पूर्वी त्यांना या वस्तूंच्या बदल्यात कधी पैसे तर कधी धान्यही मिळायचं. आता मात्र घरात मांडायला किंवा मुलांना दाखवायला म्हणून या वस्तू नेल्या जातात. ग्रामीण बाजाच्या वस्तूंना बाजारपेठेत असणारी प्रचंड  मागणी त्यांच्यापर्यंत अजूनही पोचली नसल्याने त्यांच्या वस्तू अनेक जण बाहेर जाऊन विकतात आणि हे मात्र दिवस साजरा झाल्याचे समाधान मानतात. 

          पुण्याच्या कर्वेनगर भागात धोत्रे कुटुंब राहते. त्यांना कुठल्या पिढीपासून हे काम करतात याची अचूक माहितीही नाही. मात्र कळायला लागलं तेव्हापासून वडील, आजोबा हेच काम करायचे असे ते सांगतात. त्यापैकी शामराव धोत्रे  म्हणाले की, या कामाला कष्ट फार. त्यातच एका जागी बसून पाठ दुखायला लागते. प्रत्येकवेळी गिऱ्हाईक येईलच असं नाही.आता मुलं-बाळ हे काम नाही म्हणतात.आम्ही शिकलो नाही म्हणून हेचं काम केलं.त्यांचे बंधू रघुनाथ धोत्रे  म्हणाले की, पूर्वी दगडी मूर्तींना मागणी असायची. आता ती नसल्यामुळे ते कामही थांबवलं आहे. अनेक डॉक्टर, सुशिक्षित लोक पाटा घ्यायला येतात, त्यांच्याकडे मसाला वाटायला वेगळे लोक असल्याचं ऐकून आश्चर्य वाटत असल्याचंही ते सांगतात.सरकारने निदान जातीचा दाखल तरी द्यावा अशी त्यांची मागणी आहे

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेSocialसामाजिक