शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

...तर समुद्रात उतरून संघर्ष करू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 1:30 PM

पर्ससीन व एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना १५ दिवसांचा अल्टिमेटम

दापोली : पर्ससीन व एलईडीच्या लाईटद्वारे समुद्रात मासेमारी होत असल्याने मच्छिमार व्यवसाय संकटात सापडला आहे. लाईटवरील मासेमारी थांबली नाही तर संपूर्ण मासेमारी व्यवसाय धोक्यात येणार आहे. यापुढे विनंती, निवेदन नको. आता थेट समुद्रात उतरून संघर्ष करण्याचा निर्णय मच्छिमारांनी शुक्रवारी मुंबई येथे आयोजित केलेल्या सभेत घेतला. पर्ससीन व एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना १५ दिवसांचा अल्टिमेटमही यावेळी देण्यात आला.

नॅशनल फीश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती यांच्यावतीने मुंबई ससून डॉक येथे शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष लिओ कोलासो, अखिल भारतीय मच्छीमार खलाशी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे, किरण कोळी, पी. एन. चौगुले, नॅशनल फीश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संघे, विश्वास नाखवा, आमदार राजू पुरोहित, दापोलीचे आमदार संजय कदम, आमदार अशोक पाटील यांच्यासह विविध मच्छीमार नेते, विविध मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या हल्लाबोल आंदोलनाला कोकणातील बहुसंख्य पारंपरिक मच्छीमार उपस्थित होते.

ससून डॉक येथील आंदोलनानंतर मच्छिमार बांधवांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला अनेक मच्छीमार नेत्यांनी मार्गदर्शन केले. सर्व नेत्यांनी एलईडी लाईटवरील मासेमारी धोकादायक असल्याचे सांगितले. तसेच शाश्वत मासेमारी केल्यास मच्छिमारांसमोरील संकट टळेल. त्यामुळे मच्छिमार बांधवांनी तांत्रिक मासेमारी करु नये. तांत्रिक मासेमारीमुळे सर्वांचे नुकसान होणार आहे. एलईडी लाईटवरील मासेमारीमुळे आता भरपूर मासेमारी होत आहे. परंतु अशाप्रकारच्या मासेमारीमुळे मत्स्यसाठेच नष्ट होणार आहेत. त्यामुळे ही मासेमारी धोक्याची घंटा असल्याचे  सांगण्यात आले.

एलईडी लाईटवर होणाऱ्या मासेमारीमुळे पुढील काही वर्षातच कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील मत्स्यसाठे संपुष्टात येणार आहेत. मत्स्यसाठे संपल्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. उद्या लाखो लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या पोटावर उठणाऱ्यांना नष्ट करुन टाकू, असे ठणकावून सांगण्यात आले. येत्या १५ दिवसांत संपूर्ण कोकणपट्ट्यातील एलईडी लाईटवरील मासेमारी पूर्णपणे थांबली नाही तर १६वा दिवस संघर्षाचा असेल. समुद्रात ज्या ठिकाणी लाईटवर मासेमारी सुरु असेल, त्या ठिकाणी संघर्ष सुरु होईल. त्यामध्ये कोणाचे नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली तर याला केवळ शासन जबाबदार असेल, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :fishermanमच्छीमारkonkanकोकण