शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालही घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 12:02 IST

राज्य परीक्षा परिषदेतर्फे २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.

ठळक मुद्दे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, मागील वर्षाच्या तुलनेत इयत्ता पाचवीच्या निकालात सुमारे एक ते दोन टक्क्यांनी घट झाली आहे. पाचवीचा शिष्यवृत्तीचा निकाल २२.०४ टक्के, तर आठवी शिष्यवृत्तीचा निकाल १८.४९ टक्के लागला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेस नोंदणी केलेल्या ८ लाख ६६ हजार १३१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७२ हजार ४६६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मात्र, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजार ३९४ आहे, असे परीक्षा परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य परीक्षा परिषदेतर्फे २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. परिषदेतर्फे १६ मे रोजी परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला होता. तसेच १६ ते २५ मे या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळांमार्फत ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांवर आवश्यक कार्यवाही केल्यानंतर बुधवारी (दि. १९)शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. पूर्वी इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे.पूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेचा आपल्या शाळेचा सर्वाधिक निकाल लागावा यासाठी जिल्हा परिषदेच्या  शिक्षकांमध्ये स्पर्धा होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे. त्यातच प्राथमिक शिक्षणाची रचना बदलण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून परीक्षेला प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावर झाला आहे. ............विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनच्शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विद्यार्थी तेच आहेत. परंतु, जिल्हा परिषदेच्या शाळांऐवजी दुसरे विद्यार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यावर भर द्यावा. तरच शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात वाढ होईल, असे परीक्षा परिषदेच्या अधिकाºयांनी सांगितले..................परीक्षेचे नाव         नोंदवलेले        पात्र             शिष्यवृत्तीधारक     निकालाची                             विद्यार्थी        विद्यार्थी       विद्यार्थी               टक्केवारीइयत्ता पाचवी      ५,१२,७६३       १,०९,२३०       १६,५७९                २२.०४इयत्ता आठवी     ३,५३,३६८       ६३,२३६         १४,८१५                  १८.४९एकूण                    ८,६६,१३१    १,७२,४६६        ३१,३९४                २०.५९    

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळाexamपरीक्षाEducationशिक्षणonlineऑनलाइन