शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

राज्याला निवडणुका परवडणार नाहीत

By admin | Updated: October 16, 2015 01:54 IST

भाजप-सेनेने सामंजस्याने घ्यावे, रामदास आठवले यांचा सल्ला.

बुलडाणा: शिवसेना व भाजपमध्ये सध्या वाद सुरू असून, सरकारचा पाठींबा काढण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय खरोखरीच घेतल्यास सरकार पडेल व वर्षभरात पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागेल. सरकार स्थापन होऊन उणेपुरे वर्षही झाले नसल्याने, राज्याला कोणत्याही परिस्थीतीत निवडणुका परवडणार नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असा सल्ला रिपाइंचे अध्यक्ष खा.रामदास आठवले यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. आपण स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून ही भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले. खा.आठवले बुलडाणा येथे रिपाइंच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला पाठींबा देणार नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली असल्याचे स्मरण आठवले यांनी यावेळी करून दिले. इंदूमिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला होता, हे खरे असले तरी, या मुद्यावर रिपाइंने आक्रमक भूमिका घेतली नसती, तर स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला नसता, हेही तेवढेच खरे आहे. या मुद्यावर श्रेय लाटण्याची रिपाइंला गरज नाही. ज्याला श्रेय घ्यायचे त्यांनी खुशाल घ्यावे, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल आठवले यांनी स्पष्ट केले. रिपाइंला सत्तेत १0 टक्के वाटा देण्याचे भाजपने आम्हाला लेखी दिले होते. प्रत्यक्षात किमान ५ टक्के तरी वाटा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी काही महामंडळांची मागणी यावेळी केली. सामाजिक मागासलेपणावर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे आरक्षण कुणीही हिंरावून घेवू शकत नाही. स्वत: पंतप्रधानांनीसुध्दा हिच भूमिका मांडली आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये, असे आठवले म्हणाले.