शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

राज्याला निवडणुका परवडणार नाहीत

By admin | Updated: October 16, 2015 01:54 IST

भाजप-सेनेने सामंजस्याने घ्यावे, रामदास आठवले यांचा सल्ला.

बुलडाणा: शिवसेना व भाजपमध्ये सध्या वाद सुरू असून, सरकारचा पाठींबा काढण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय खरोखरीच घेतल्यास सरकार पडेल व वर्षभरात पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागेल. सरकार स्थापन होऊन उणेपुरे वर्षही झाले नसल्याने, राज्याला कोणत्याही परिस्थीतीत निवडणुका परवडणार नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असा सल्ला रिपाइंचे अध्यक्ष खा.रामदास आठवले यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. आपण स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून ही भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले. खा.आठवले बुलडाणा येथे रिपाइंच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला पाठींबा देणार नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली असल्याचे स्मरण आठवले यांनी यावेळी करून दिले. इंदूमिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला होता, हे खरे असले तरी, या मुद्यावर रिपाइंने आक्रमक भूमिका घेतली नसती, तर स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला नसता, हेही तेवढेच खरे आहे. या मुद्यावर श्रेय लाटण्याची रिपाइंला गरज नाही. ज्याला श्रेय घ्यायचे त्यांनी खुशाल घ्यावे, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल आठवले यांनी स्पष्ट केले. रिपाइंला सत्तेत १0 टक्के वाटा देण्याचे भाजपने आम्हाला लेखी दिले होते. प्रत्यक्षात किमान ५ टक्के तरी वाटा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी काही महामंडळांची मागणी यावेळी केली. सामाजिक मागासलेपणावर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे आरक्षण कुणीही हिंरावून घेवू शकत नाही. स्वत: पंतप्रधानांनीसुध्दा हिच भूमिका मांडली आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये, असे आठवले म्हणाले.