शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला निवडणुका परवडणार नाहीत

By admin | Updated: October 16, 2015 01:54 IST

भाजप-सेनेने सामंजस्याने घ्यावे, रामदास आठवले यांचा सल्ला.

बुलडाणा: शिवसेना व भाजपमध्ये सध्या वाद सुरू असून, सरकारचा पाठींबा काढण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय खरोखरीच घेतल्यास सरकार पडेल व वर्षभरात पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागेल. सरकार स्थापन होऊन उणेपुरे वर्षही झाले नसल्याने, राज्याला कोणत्याही परिस्थीतीत निवडणुका परवडणार नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असा सल्ला रिपाइंचे अध्यक्ष खा.रामदास आठवले यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. आपण स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून ही भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले. खा.आठवले बुलडाणा येथे रिपाइंच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला पाठींबा देणार नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली असल्याचे स्मरण आठवले यांनी यावेळी करून दिले. इंदूमिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला होता, हे खरे असले तरी, या मुद्यावर रिपाइंने आक्रमक भूमिका घेतली नसती, तर स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला नसता, हेही तेवढेच खरे आहे. या मुद्यावर श्रेय लाटण्याची रिपाइंला गरज नाही. ज्याला श्रेय घ्यायचे त्यांनी खुशाल घ्यावे, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल आठवले यांनी स्पष्ट केले. रिपाइंला सत्तेत १0 टक्के वाटा देण्याचे भाजपने आम्हाला लेखी दिले होते. प्रत्यक्षात किमान ५ टक्के तरी वाटा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी काही महामंडळांची मागणी यावेळी केली. सामाजिक मागासलेपणावर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे आरक्षण कुणीही हिंरावून घेवू शकत नाही. स्वत: पंतप्रधानांनीसुध्दा हिच भूमिका मांडली आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये, असे आठवले म्हणाले.