शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

राज्याला निवडणुका परवडणार नाहीत

By admin | Updated: October 16, 2015 01:54 IST

भाजप-सेनेने सामंजस्याने घ्यावे, रामदास आठवले यांचा सल्ला.

बुलडाणा: शिवसेना व भाजपमध्ये सध्या वाद सुरू असून, सरकारचा पाठींबा काढण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय खरोखरीच घेतल्यास सरकार पडेल व वर्षभरात पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागेल. सरकार स्थापन होऊन उणेपुरे वर्षही झाले नसल्याने, राज्याला कोणत्याही परिस्थीतीत निवडणुका परवडणार नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असा सल्ला रिपाइंचे अध्यक्ष खा.रामदास आठवले यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. आपण स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून ही भूमिका मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले. खा.आठवले बुलडाणा येथे रिपाइंच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला पाठींबा देणार नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली असल्याचे स्मरण आठवले यांनी यावेळी करून दिले. इंदूमिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला होता, हे खरे असले तरी, या मुद्यावर रिपाइंने आक्रमक भूमिका घेतली नसती, तर स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला नसता, हेही तेवढेच खरे आहे. या मुद्यावर श्रेय लाटण्याची रिपाइंला गरज नाही. ज्याला श्रेय घ्यायचे त्यांनी खुशाल घ्यावे, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल आठवले यांनी स्पष्ट केले. रिपाइंला सत्तेत १0 टक्के वाटा देण्याचे भाजपने आम्हाला लेखी दिले होते. प्रत्यक्षात किमान ५ टक्के तरी वाटा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी काही महामंडळांची मागणी यावेळी केली. सामाजिक मागासलेपणावर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे आरक्षण कुणीही हिंरावून घेवू शकत नाही. स्वत: पंतप्रधानांनीसुध्दा हिच भूमिका मांडली आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये, असे आठवले म्हणाले.