शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

राज्य सरकारने आता जेवणासाठी रेस्टॉरंट्स खुली करावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 2:30 PM

मुंबईसह महाराष्ट्रात या व्यवसायावर पाच लाखांहून अधिक जणांचे कुटुंबे अवलंबून आहेत.

ठळक मुद्देअन्यथा चाळीस टक्के रेस्टॉरंट्स बंद पडण्याचा धोका निर्माण

पुणे : राज्यातील रेस्टॉरंट्समधून आजमितीला फक्त पार्सल सेवा सुरु आहे. परंतु, ती तितकी पुरेशी नाही. रेस्टॉरंट व्यावसायिकांना त्यातून फारसे उत्पन मिळत नाही. मुंबईसह महाराष्ट्रात या व्यवसायावर पाच लाखांहून अधिक जणांचे कुटुंबे अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे फिरतीवर असणाऱ्या अनेक नागरिकांकरिता रेस्टॉरंटमधील जेवण सुरु होणे आवश्यक आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात जेवणासाठी रेस्टॉरंट्स सुरु करण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. आता राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा चाळीस टक्के रेस्टॉरंट्स बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना लॉकडाऊनकाळात रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद होती. मात्र त्यानंतर अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात पार्सल सेवा सुरु करण्याची परवानगी मिळाली. आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात जेवणासाठी रेस्टॉरंट्स खूली करण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा चाळीस टक्के रेस्टॉरंट्स बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

सरकारने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून रेस्टॉरंट्स चालू केली जावीत. सामायिक अंतर राखावे, वस्तू हाताळण्यापूर्वी निर्जंतुकीकरण व्हावे, आदी नियमांसाठी तसेच कर्मचारी आणि ग्राहक यांच्या आरोग्याची दक्षता घेण्याबाबत रेस्टॉरंट व्यवसायिकांनी तयारी दर्शविली आहे. सरकारने त्याप्रमाणे कडक बंधनेही घालावी. मात्र, आता लवकरात लवकर गेले सहा महिने या व्यवसायाची सुरू असलेली कोंडी दूर व्हावी. रेस्टॉरंट व्यवसायावर दूध, भाजीपाला, धान्य पुरवठादार आदी व्यापारी अवलंबून असतात. रेस्टॉरंट्स खुली केल्यास त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल, कराद्वारे सरकारचे उत्पन्न वाढेल.सरकारने खाजगी बससेवा, लॉजेस, एसटी बससेवा यांना परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे रेस्टॉरंट्सचाही विचार व्हावा असे निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेhotelहॉटेलfoodअन्नbusinessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या