शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, अजित पवार यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 17:55 IST

राज्य सरकार घोषणांच्या पलिकडे काहीच करीत नाही. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करीत नाही. कुठल्याही शेतमालाला आधारभूत किंमत दिली जात नाही. एकंदरित, या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडले आहे, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

लातूर - राज्य सरकार घोषणांच्या पलिकडे काहीच करीत नाही. केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करीत नाही. कुठल्याही शेतमालाला आधारभूत किंमत दिली जात नाही. एकंदरित, या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडले आहे, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचे जिल्ह्यात शुक्रवारी आगमन झाले. त्यानिमित्ताने अजित पवार हे लातुरात आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते नवाब मलिक, आ. विक्रम काळे, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष मकरंद सावे आदींची उपस्थिती होती. अजित पवार म्हणाले, कापसाला भाव नाही. बोंडअळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. शेतक-यांकडील कापूस संपल्यानंतर भाव वाढले. त्याचा फायदा व्यापा-यांना होत आहे. कर्जमाफीची घोषणा झाली. पण त्याचा प्रत्यक्ष लाभ होताना दिसून येत नाही. ज्या शेतक-यांनी कर्जाची वेळेवर परतफेड केली, त्यांना जाहीर करण्यात आलेले २५ हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळत नाही. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. ओबीसी, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. एकंदरित, राज्यातील सत्ताधाºयांनी शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. शेजारील तेलंगणा राज्यात शेतक-यांना २४ तास मोफत वीज दिली जात आहे. पण आपल्या राज्यात शेतक-यांना ८ तास वीज हे सरकार देऊ शकत नाही. ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी ५० हजार रुपये मागितले जात आहेत, असा आरोपही अजित पवार यांनी केला. शेतकरी नडतो त्यावेळी सबुरीने घ्यावे लागते, ही इच्छाऱ्यांना वीज बिले दिली जात आहेत, असाही आरोप पवार यांनी केला. राठोड कुटुंबाला लाखाची मदत औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शेतकरी शहाजी राठोड यांना कृषी पंपाचे ६० हजारांचे बिल देण्यात आले होते. त्यांनी महावितरणच्या कार्यालयात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या शेतक-याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. हे कुटुंब पिठाची गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह भागवीत आहे. या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना एक लाखाची मदत देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, असेही ते म्हणाले. कोरेगाव भीमा दंगलीचा मास्टरमार्इंड कोण?.. १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचा मास्टरमार्इंड शोधण्यात सरकारला अद्याप यश आले नाही. या घटनेतून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, याचा मास्टरमार्इंड कोण आहे, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. सोलर कृषी पंपाची योजना बंद... सरकारने शेतक-यांसाठी सोलरचे कृषी पंप देण्याची घोषणा केली होती. केवळ २२०० कृषी पंप देऊन ती योजना बंद करण्यात आली आहे. नागपूर समृद्धी महामार्गावरील शेतक-यांना पाचपट अधिक भाव देण्याची मागणी आम्ही केली आहे. कोणत्याही समस्याबद्दल, प्रश्नाबद्दल आम्ही अभ्यास करीत आहोत. चौकशी करू, एवढे ठराविक उत्तर सत्ताधाºयांकडून मिळत आहे, असेही अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी