शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

कर्मचाऱ्यांच्या LIC चा हप्ता ST ने भरलाच नाही; मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 06:09 IST

एलआयसीचे कापून घेतलेले हप्ते भरले गेले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. संघटनांचा सरकारला सवाल 

प्रसाद कानडेपुणे : राज्य परिवहन महामंडळाने मागील चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एलआयसीचा हप्ता कापला खरा, पण तो एलआयसीकडे भरलाच नाही. त्यामुळे या चार महिन्यांत कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. एसटीच्या ह्या भोंगळ कारभारामुळे अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन थकले नसले, तरी एलआयसीचा हप्ता न भरणे हा कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी चाललेला जीवघेणा खेळ आहे. एसटीने जवळपास २० कोटी रुपये एलआयसीकडे भरलेच नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. एसटी प्रशासनाने ९ कुटुंबे सोडता अन्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना मदत केलेली नाही. 

२३९ कर्मचारी मृत; मदत केवळ ९ जणांनाआतापर्यंत कोरोना संसर्गामुळे एसटीच्या २३९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पैकी ९ जणांना ५० लाख रुपयांचे आर्थिक साह्य केले. एलआयसीचा हप्ता थकविला त्या काळात १०० ते १५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांना मदत केलेली नाही.

जवळपास २४०० कोटी थकविलेएसटीचा आतापर्यत संचित तोटा हा ९ हजार कोटी रुपयांचा झाला आहे. जवळपास २४०० कोटी रुपये थकविले आहे. यात एसटी बँक, एलआयसी, डिझेल , सुरक्षा, ब्रिक्स कंपनी, सेवा निवृत्त कर्मचारी आदींचा समावेश आहे.

एलआयसीचे कापून घेतलेले हप्ते भरले गेले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पॅालिसी लॅप्स होत असलेले मेसेजेस येत आहेत. बँक सोसायटीचीही तीच अवस्था आहे. आमचे हक्काचे पैसे व त्याचा डिव्हिडंड आम्हाला मिळू शकत नाही. दुर्दैवाने मृत्यू आला तर भरपाई कोण देणार? - संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी